स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 18, 2021
in मुंबई - पुणे - ठाणे
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि.१८: समाज एकसंघ ठेवण्यासाठीचा संदेश असलेले ‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नवीन पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित गृहविभागाचे प्रधान सचिव विनित अग्रवाल यांनी लिहिलेले पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी श्री.पवार बोलत होते. यावेळी गृहविभागचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेखक तथा प्रधान सचिव विनित अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, या पुस्तकाद्वारे वाचकांना नवी दिशा मिळेल. पुस्तकाचे लेखक श्री.अग्रवाल हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांनी अतिशय विचारपूर्वक व मेहनतीने हे पुस्तक लिहिले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात आपण काम करीत असलो तरी मनात लपलेला लेखक वेळात वेळ काढून लिहितोच त्यातूनच श्री.अग्रवाल यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी श्री.अग्रवाल यांचे कौतुक केले.

प्रास्तविकात विनित अग्रवाल म्हणाले, समाजात वावरत असताना पडलेले विविध प्रश्न, त्याचे उत्तर शोधण्यामागची धावपळ, ही यामागील प्रेरणा आहे. 251 पाने असलेल्या पुस्तकात 30 वेगवेगळे पाठ (चॅप्टर) असून विविध उपनिषदे यात ईशउपनिषद, सांख्ययोग यावरील भाष्यही आहे. तसेच प्रश्नोत्तरेदेखील आहेत.

कार्यक्रमास प्रधान सचिव, सचिव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लेखकाविषयी माहिती

राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव असलेले विनित अग्रवाल हे आय आय टी (दिल्ली) मधून अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तसेच त्यांनी मॅनेजमेंटमध्ये उच्च पदवी मिळविली आहे. काही काळ कार्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सी.बी.आय. तसेच राज्य शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. पोलीस दलातील मानाचे व प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना मिळाले आहे.

विनित अग्रवाल हे मान्यवर लेखक आहेत. विश्लेशणात्मक शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील अनुभवावर त्यांनी “रोमांस ऑफ अ नक्शलाईट” हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे स्वागत माध्यम तसेच जनेतेने केले. तद्नंतर त्यांनी महाभारतावर आधारीतर “ऑन दि ईव्ह ऑफ कलयुग” हे काव्यनाटय असलेले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकासही उत्तम प्रतिसाद लाभला आणि आता हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार – गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

Next Post

नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासाठी केंद्राकडून 4.25 कोटींचा निधी वितरीत

Next Post

नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासाठी केंद्राकडून 4.25 कोटींचा निधी वितरीत

ताज्या बातम्या

पसरणी घाटात दोन कारची धडक, पर्यटनाला आलेले पती-पत्नी व लहान मुलगी जखमी

March 8, 2021

कोरेगावनजिक अपघातात बिजवडीचा मोटारसायकलस्वार ठार

March 8, 2021

लोणंदच्या भारत गिअर्सचे कामगार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण

March 8, 2021

कार्यक्रमांना गर्दी; प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल पालिका व पोलीस प्रशासनाची कारवाई

March 8, 2021

रात्री उशिरा सुरू असणार्‍या दोन हॉटेलचालकांवर गुन्हा 

March 8, 2021

राज्यात भाजपचे सरकार येईल येईल ना. रामदास आठवले : नाराज काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल

March 8, 2021

तालुक्यातील मातंग समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

March 8, 2021

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.