स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

अंतिम वर्ष परीक्षेतील तांत्रिक त्रुटींच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

Team Sthairya by Team Sthairya
December 17, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१७: यंदा कोरोनाच्या
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा
राज्यातील विद्यापीठांना ऑनलाइन घेण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण
विभागाने केल्या होत्या. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या काही विद्यापीठांना
अंतिम वर्षाच्या परीक्षांवेळी काही तांत्रिक अडचणी आल्याने मनस्ताप सहन
करावा लागल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या. याच
पार्श्वभूमीवर या तांत्रिक त्रुटींच्या चौकशीसाठी मंत्रालयातील माहिती
तंत्रज्ञान संचालनालयाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन
करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ, आयडॉल विभागाच्या अंतिम
परीक्षांच्या संदर्भात कंपनीकडून झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे
विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. याच प्रकारे पुण्याच्या
सावित्रीबाई फुले, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ,
अमरावती विद्यापीठ येथेही तांत्रिक बिघाडांमुळे अडचणी आल्याच्या तक्रारी
उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

२३ ऑक्टोबर रोजी व्हिडीओ
कॉन्फरन्सिंगद्वारे २०१९-२०च्या अंतिम वर्ष परीक्षेच्या घेण्यात आलेल्या
आढाव्यात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सर्व विद्यापीठांच्या
कुलगुरूंच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी या त्रुटींच्या
चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समितीला ज्या
विद्यापीठांत परीक्षांच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाले, त्यांची चौकशी
करून एक महिन्याच्या आत अहवाल सरकारला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत.

अशी आहे समिती

समितीमध्ये अध्यक्षांसह एकूण ७ सदस्यांचा समावेश आहे. तंत्र शिक्षण संचालक व
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव हे समितीचे सदस्य असणार असून संबंधित
विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हे
निमंत्रित सदस्य म्हणून काम पाहतील. उच्च शिक्षण संचालक हे समितीचे सदस्य
सचिव आहेत.

Related


Tags: राज्य
Previous Post

स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्र सरकारची मंजुरी

Next Post

डी.के.पवार यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद: रणजितसिंह देशमुख

Next Post

डी.के.पवार यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद: रणजितसिंह देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशवासियांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! : ना. श्रीमंत रामराजे

August 15, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

August 15, 2022

नवीन नागपूरच्या नियोजनबद्ध विकासाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 15, 2022

रानभाजी महोत्सावाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

August 15, 2022

ज्ञानाधिष्ठीत समाज निर्मितीसाठी जिल्ह्यात ‘वाचक वाढवा’ मोहिमेस सुरुवात

August 15, 2022

सदरबझार पोलीस चौकीच्या नुतन इमारतीचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

August 15, 2022

अमृत महोत्सवी वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सारेच संकल्पबद्ध होऊ या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 15, 2022

जिल्ह्याच्या विकासाची परपंरा अधिक वृद्धिंगत करणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

August 15, 2022

महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल; सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

August 15, 2022

ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

August 15, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!