स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

15 मिनीटांच्या अंतरात दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 27, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २७: कृषी कायद्याच्या निषेधार्थ 26 जानेवारी रोजी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर आतापर्यंत 22 FIR नोंदविण्यात आल्या असून, 200 पेक्षा जास्त समाज कंटकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, कारवाईच्या काही वेळातच शेतकरी संघटना आंदोलनातून माघार घेतल्याचे दिसत आहे. आज(दि.27) सायंकाळी साडेचार वाजता शेतकरी मजुर संघटनेने आंदोलनातून माघार घेतल्याचे जाहीर केले. याच्या 15 मिनीटानंतर भारतीय शेतकरी यूनियननेही आंदोलनातून माघार घेतली.

राष्ट्रीय शेतकरी मजुर संघटनेचे चीफ वीएम सिंह म्हणाले की, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराची संपूर्ण जबाबदारी भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी घ्यावी. आम्ही अशा दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीसोबत हे आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि या आंदोलनातून माघार घेतल्याचे जाहीर करतो.

तिकडे, भारतीय शेतकरी यूनियन (भानु) चे अध्यक्ष भानुप्रताप सिंह म्हणाले की, मंगळवारी दिल्लीत जे काही झाले, त्यामुळे खूप दुःख झाले आहे. आम्ही मागील 60 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेत आहोत. शेतकऱ्यांना उपाय हवाय, पण काही लोकांनी त्यांना पागल ठरवले. शेतकऱ्यांनी अशा नेत्याच्या मागे लागू नये, जो आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिसांचा दावा- आंदोलक दारू पिऊन आले होते

पोलिसांचा दावा आहे की, ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 जवान जखमी झाले. तसेच, काही जणांनी जवानांकडून अश्रुगोळे सोडणारी गन हिसकाऊन घेतलो होती. एका व्यक्तीकडे ती लाल किल्यात पाहण्यात आली होती. दरम्यान, उत्तर दिल्लीचे कार्यकारी DCP संदीप यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांनी दारू पिलेली होती. त्यांनी आमच्यावर तलवार आणि लाठ्या-काठ्याने हल्ला केला.

FIR मध्ये 6 शेतकरी नेत्यांचे नावे

पोलिसांनी जी FIR दाखल केली आहे, त्यातील एका एफआयआरमध्ये 6 शेतकरी नेत्यांची नावे सामील आहेत. यात- राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल आणि जोगिंदर सिंह आहेत. यांच्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीतील नियम मोडल्याचा आरोप आहे.

पोलिसांचा दावा-हिंसेत 300 जवान जखमी झाले

दरम्यान, उपद्रव्यांची ओळख पटण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवा, लाल किल्ला आणि सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रो व्यवस्थापनाने आज पुन्हा लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की, काल झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. एका अॅडिशनल DCP वर तलवारने हल्ला करण्यात आला.

लाल किल्यावर रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात

पोलिसांनी सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर सुरक्षा वाढवली आहे. येथूनच शेतकरी आंदोलन सक्रीय झाले होते. तिकडे, लाल किल्यावरदेखील सुरक्षा वाढवली आहे. तिथे सध्या रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे परिसरात लक्ष्य ठेवले जात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रह्लाद पटेल यांनी बुधवारी लाल किल्या जाऊन नुकसानीची पाहणी केली.


ADVERTISEMENT
Previous Post

कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, निकालावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Next Post

मलठण मधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा; नरसिंह निकम व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पोलीस स्टेशनला मागणी

Next Post

मलठण मधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा; नरसिंह निकम व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पोलीस स्टेशनला मागणी

ताज्या बातम्या

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021

कर्नाटकात जॉब फॉर सेक्स स्कँडल : भाजपच्या मंत्र्यांनी CD समोर आल्यानंतर दिला राजीनामा, नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप

March 3, 2021

पुण्यात भीषण आग : बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर

March 3, 2021

हिंगोली : शासकीय रुग्णालयातील वार्डमधील छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

March 3, 2021

लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

March 3, 2021

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

March 3, 2021

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.