स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंगळवारपासून अमरावती शहर व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात आठवडाभराचा लॉकडाऊन; मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 21, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, अमरावती, दि.२१: गेल्या आठवडाभरापासून अगदी सुसाट धावणारा कोरोना थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी अमरावतीत पुन्हा 727 ही विक्रमी संख्या बाहेर आली आहे. या नव्या संख्येमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 28 हजार 815 झाली आहे. यानंतर आता राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, लॉकडाऊन 22 फेब्रुवारीच्या संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहरासाठी घोषित करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील. स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज आहे. अंतर ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे. यामध्ये जर कुणी आंदोलन करण्याचे किंवा राजकीय काही करायचे ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल’, असे त्या म्हणाल्या.

दिवसभरामध्ये 727 रुग्णसंख्येचा नकोसा विक्रम; 7 बाधितांचा मृत्यू

गेल्या आठवडाभरापासून अगदी सुसाट धावणारा कोरोना थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी पुन्हा 727 ही विक्रमी संख्या बाहेर आली आहे. या नव्या संख्येमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 28 हजार 815 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात सात जणांचा मृत्यू ओढवला. दुसरीकडे रुग्णसंख्या जास्त असलेल्या परिसरांची चाचपणी सुरू झाली असून उद्या त्या भागात कन्टोन्मेंट झोनही तयार केले जाणार आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

फलटण तालुक्यातील १ तर जिल्ह्यातील ५३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

Next Post

औरंगाबाद : कोरोनाची लस घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; शनिवारी 144 रुग्ण, दोन मृत्यू

Next Post

औरंगाबाद : कोरोनाची लस घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; शनिवारी 144 रुग्ण, दोन मृत्यू

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी – श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.