स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औरंगाबाद : कोरोनाची लस घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; शनिवारी 144 रुग्ण, दोन मृत्यू

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 21, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, औरंगाबाद, दि.२१: सध्या राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आङे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन किंवा नियम कडक करण्यात आली आहेत. परंतु, दुसरीकडे लसीकरणानेही वेग घेतला आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. पण, यात आता कोरोनाची लस घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधील एका पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी लसीचा पहिला डोस घेतलेले बेगमपुरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी भास्कर शंकर मेटे (52, रा. मयूर पार्क, हर्सूल परिसर) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मेटेंसोबत बेगमपुरा पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही लस घेतली होती. तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जळगाव रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने एमजीएममध्ये दाखल केले होते. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिस अंमलदार नीळ तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या मनातील लसीविषयीची भीती दूर करण्याची जबाबदारी उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षकांना दिली जाणार आहे, असे डॉ. निखिल गुप्ता म्हणाले.

लग्नसोहळ्यात 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी असतील तर कारवाई

आज फेब्रुवारीमधील (माघ) शेवटचा मुहूर्त रविवारी (21 फेब्रुवारी) आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात सुमारे 200 विवाह सोहळे होणार आहेत. त्यातील काही खुल्या मैदानात होत आहेत. कोरोनाचा पुन्हा फैलाव होत चालल्याने मंगल कार्यालयातील गर्दी रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने पथके स्थापन केली आहेत. 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी असतील तर कारवाई होणार आहे. त्यामुळे संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

…तर रिक्षा जप्त होणार

शहरात 35 हजार रिक्षाचालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. मास्क नसलेल्या चालकाची रिक्षा जप्त करण्याची कारवाई लवकरच हाती घेत आहोत, असे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले. शनिवारी गुप्ता यांच्यासह पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपायुक्त मीना मकवाना यांनी जिल्हा रुग्णालयात लस घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या वेळी डॉ. पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी उपस्थित होते.

आता थेट कोविड सेंटरमध्येच होणार रुग्णांची भरती

तीन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी मिळाली होती. मात्र, आता रुग्णसंख्या वाढत चालल्याने ती परवानगी रद्द करण्यात आली असून रुग्णांना थेट मनपाच्या कोविड सेंटरमध्येच भरती व्हावे लागणार आहे. मेल्ट्रॉन (300 रुग्ण), पदमपुरा कोविड सेंटर (50) पूर्ण क्षमतेने भरले आहे. म्हणून 400 रुग्ण क्षमतेचे किलेअर्क, एमजीएम येथील सेंटर पुन्हा सुरू केल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शनिवारी 144 रुग्ण, दोन मृत्यू

जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 144 रुग्ण आढळले तर दाेघांचा मृत्यू झाला. अाता एकूण रुग्णांची संख्या 48,437 झाली अाहे. मनपा अाणि ग्रामीण हद्दीतील 57 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46,399 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1251 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 787 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आहेत.


ADVERTISEMENT
Previous Post

मंगळवारपासून अमरावती शहर व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात आठवडाभराचा लॉकडाऊन; मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

Next Post

नियमांची कडक अंमलबजावणी करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Next Post

नियमांची कडक अंमलबजावणी करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ताज्या बातम्या

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी

March 5, 2021

शिक्षणमंत्र्यांचा खुलासा : 31 हजार शिक्षकांचे अस्तित्व पणाला, ना वेतन ना दिलासा; संधी देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

March 5, 2021

अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल

March 5, 2021

हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

March 5, 2021

ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी

March 5, 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

March 5, 2021

नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश

March 5, 2021

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

March 5, 2021

अनंत अडचणीत पारदर्शी व काटकसरीने सद्गुरू पतसंस्था कार्यरत

March 5, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त सुझुकी वाहन खरेदीवर ऑफर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.