• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

उर्मिला मातोंडकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश, रश्मी ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 1, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१: राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार
आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश
केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी
उर्मिलाच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,
राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांची
उपस्थिती होती.

उत्तर मुंबईतून झाला होता पराभव

लोकसभा
निवडणुकीच्या तोंडावर 27 मार्च 2019 रोजी उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश
केला होता. तिने उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र कठोर परिश्रम
करूनही तिला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिने काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांवर सहकार्य न करण्याचा आरोप करत 10 सप्टेंबर 2019 रोजी
काँग्रेसचा हात सोडला. एक वर्ष दोन महिन्यांनंतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा
शिवसेनेबरोबर आपली राजकीय कारकीर्द सुरू करत आहे.

राज्यपाल कोट्यातून 12 सदस्यांची उमेदवारी निश्चित केली जाणार आहे

राज्यपालांच्या
कोट्यातील नामांकनासाठी 11 इतर लोकांची नावे महाविकास आघाडी सरकारने
पाठवली आहेत. राज्यपालांनी या 12 नावांच्या यादीला मंजुरी देणार आहे.
उर्मिलाने अलिकडेच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना
रनोटवर टीका केली होती. ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हाती घेणार अशी
चर्चा होती, पण आता याची पुष्टी झाली आहे.

उर्मिलाची चित्रपट कारकीर्द

4
फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या उर्मिलाने 1982 सालच्या ‘कलयुग’ या
चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 1991
च्या नरसिम्हा चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर 1995 मध्ये
रंगीला, 1997 मध्ये जुदाई आणि 1998 मध्ये सत्या चित्रपटांतील तिच्या
अभिनयाचे कौतुक केले. या तिन्ही चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी
नामांकन मिळाले होते.

9 वर्षांनी लहान व्यावसायिकासोबत केले लग्न

उर्मिलाने
2016 मध्ये 9 वर्षांनी लहान काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरसोबत
विवाह केला. मोहसिनने जोया अख्तर दिग्दर्शित ‘लक बाय चान्स’ चित्रपटात काम
केले आहे. यामध्ये ते फरहान अख्तरसोबत मॉडेलिंग करताना दिसले होते.


Tags: राज्य
Previous Post

योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा…

Next Post

शिर्डी : साई मंदिरात प्रवेश करताना आता ड्रेसकोड, शिर्डीच्या साईसंस्थानची भाविकांना विनंतीवजा सूचना

Next Post

शिर्डी : साई मंदिरात प्रवेश करताना आता ड्रेसकोड, शिर्डीच्या साईसंस्थानची भाविकांना विनंतीवजा सूचना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!