स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

माणूसकीची भिंत हा उपक्रम माणूसकी जपणारा : मुख्याधिकारी प्रसाद काटकर

Team Sthairya by Team Sthairya
November 30, 2020
in Uncategorized

स्थैर्य, फलटण दि.२९ : फलटण शहरात माणूसकीच्या भावनेतून काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सुरु केलेला माणूसकीची भिंत हा उपक्रम माणूसकी जपणारा आणि गोर गरिबांना आधार देणारा असून जनतेने या उपक्रमास भरभरुन सहकार्य करावे असे आवाहन फलटण नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.फलटण शहरातील म. फुले चौकामध्ये माणूसकीची भिंत या नको असेल ते द्या, पाहिजे असेल ते घेऊन जा या उपक्रमाचे उदघाटन प्रसंगी मुख्याधिकारी प्रसाद काटकर बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद बांधकाम फलटण उपविभाग सहाय्यक अभियंता सुनील गरुड, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, मराठा क्रांती मोर्चाचे माऊली सावंत यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.

फलटण तालुक्यात सामाजिक भान ठेवून समाजकार्य करणारी मंडळी एकत्र येऊन कोरोनाच्या संकट काळात विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे, सध्या थंडी सुरु झाली असून गोरगरिबांना माणूसकीची भिंत या उपक्रमाच्या माध्यमातून उबदार कपडे, अंथरुण, पांघरुण मोफत मिळणार आहेत, ज्यांच्याकडे देण्याची दानत आहे त्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी यावेळी केले.

माणूसकीची भिंत या उपक्रमाची देखभाल करणारे अमित मठपती यांचा सत्कार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमास पहिल्याच दिवशी शहर वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यांच्याकडे नको असणारे जे जे होते मग त्यामध्ये कपडे, साड्या, बॅगा, पर्स, शाळेच्या विद्यार्थ्यांची जुनी सुस्थितीतील दप्तरे, जुन्या चप्पल्स, बूट, महिलांच्या पर्स, उबदार कपडे, चादरी वगैरे अनेकांनी येथे आणून देऊन सढळ हाताने मदत केली, त्याचप्रमाणे ज्यांना गरज होती त्यांनी ते घेऊन जाताना संकोच केला नाही इतकी आपुलकी संयोजकांनी जपल्याचे दिसून आले.

माणूसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम म. फुले चौक, फलटण येथे गोरगरीब जनतेसाठी सुरु करण्यात आला असून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत हा उपक्रम दि. 6 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. ज्यांना कपडे, उबदार पांघरुण, जीवनावश्यक वस्तू यांची गरज आहे त्यांनी घेऊन जावे तसेच दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Tags: फलटण
Previous Post

सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना

Next Post

साखळी उपोषण कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगीत

Next Post

साखळी उपोषण कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

August 13, 2022

केंद्र पुरस्कृत योजनांचे काम समाधानकारक – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

August 13, 2022

जन जागृतीसाठी फलटणमध्ये वृक्षदिंडी संपन्न

August 13, 2022

मायणीतील जमीन फसवणूक प्रकरणात आ. जयकुमार गोरे यांना जामीन मंजूर

August 13, 2022

प्रवचने – देहाचे भोग आणि आनंद

August 13, 2022

यवतेश्वर घाटात कार तिनशे फुट दरीत

August 13, 2022

मोळाचा ओढा परिसरातील पाच गाळे पालिकेकडून सील

August 13, 2022

श्रीमंत रघुनाथराजे मोफत ध्वज देणार

August 13, 2022

अतिवृष्टीमुळे वावदरे येथे घरांची पडझड

August 13, 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सावरकर व लोकमान्य स्मारकास भेट

August 13, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!