स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

साखळी उपोषण कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगीत

Team Sthairya by Team Sthairya
November 30, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, फलटण, दि.२९ : श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हॅली डिस्टीलरी मधील सेवानिवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटी व थकीत पगाराच्या रक्कमा मिळण्यासाठी दि. 9 नोव्हेंबर पासून येथील अधिकार गृह इमारतीसमोर फलटण तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरु असलेले साखळी उपोषण कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगीत करण्यात आले आहे. 

श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळेतील सन 2017 ते 2020 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 150 कामगारांची ग्रॅच्युईटी, थकीत पगार व अन्य सुमारे 4 कोटी 67 लाख रुपयांची येणी प्रलंबीत असून नियमानुसार कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर रक्कमा त्यांना मिळणे अपेक्षीत आहे, मात्र कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्याने अन्य व्यवस्थापनामार्फत चालवून त्याला पूर्ववैभवाप्रत नेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नातून आज कारखान्याची स्थिती सुधारत असताना काही आर्थिक अडचणी दूर करण्यास उशीर झाल्याने हा प्रश्‍न निर्माण झाल्याचे दोन्ही बाजूच्या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले व प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कारखाना व्यवस्थापन कामगारांची सदर देणी देण्यासाठी आर्थिक तरतुदी करुन निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याबाबत कारखाना व्यवस्थापन व फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार सन 2020 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युएटी व इतर थकीत रक्कम माहे फेब्रुवारी 2021 अखेर अदा करण्याबाबत सहमती देण्यात आल्याने सदरचे साखळी उपोषण स्थगीत करण्यात आले आहे. या चर्चेत कामगारांच्यावतीने अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्यासमवेत अशोकराव रणवरे, रवी फडतरे वगैरेंनी सहभाग घेतला होता. 

सदर साखळी उपोषणा दरम्यान कामगार व कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये एकमत होवून सदरचा प्रश्‍न 21 दिवसाच्या साखळी उपोषणानंतर स्थगीत करण्यात यश आले असल्याचे स्पष्ट करीत कारखाना व्यवस्थापनाने लेखी आश्‍वासन दिल्यामुळे सदरचे आंदोलन स्थगीत करण्यात आले असल्याचे अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी सांगितले. 

फलटण तालुका संघर्ष समिती व कामगारांना कारखान्याच्यावतीने लेखी आश्‍वासन देताना कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहुराज भोसले, अ‍ॅड. नरसिंह निकम, रवी फडतरे, नगरसेवक अशोकराव जाधव, राजेंद्र नागटीळे, अशोककाका पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक रावळ आणि कामगार उपस्थित होते. 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

आंदोलना दरम्यान भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आय, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय, शेतकरी संघटना वगैरे राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठींबा व्यक्त केला. तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Related


Tags: फलटण
Previous Post

माणूसकीची भिंत हा उपक्रम माणूसकी जपणारा : मुख्याधिकारी प्रसाद काटकर

Next Post

लोकसेवेच्या संधीचे सोने करीन : ललिता बाबर

Next Post

लोकसेवेच्या संधीचे सोने करीन : ललिता बाबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“हर घर तिरंगा” या अभियानासाठी फलटणमध्ये श्रीमंत संजीवराजे मोफत ध्वज देणार

August 11, 2022

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

August 11, 2022

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 11, 2022

देश स्वतंत्र करण्यासाठी तरुणांनी रक्ताचे अर्ध्य दिले

August 11, 2022

रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय असावा- शास्त्रज्ञ डॉ. इंडी

August 11, 2022

शहीद हसेन – हुसेन यांच्या ताबुताला आटपाडीच्या नाथांनी दिला खांदा !

August 11, 2022

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम प्रभात फेरी द्वारे संपन्न

August 11, 2022

आज काँग्रेसची आझादी गौरव यात्रा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

August 11, 2022

मुधोजी महाविद्यालयात M.Com. व M.Sc चे वर्ग सुरू

August 11, 2022
कटफळ गावातून रॅली काढताना झेनिबियाचे विद्यार्थी

झैनबिया स्कूलच्या वतीने घर घर तिरंगा रॅली

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!