स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहिती आयुक्तांनी विद्यापिठाच्या सहायक कुलसचिवांना ठोठावला दंड

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 22, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, औरंगाबाद, दि.२२: माहिती आधिकारात विद्यापीठातील पीएचडी विभागामार्फत माहिती मागीतली तरी माहिती न दिल्यामुळे माहिती आयुक्तांनी विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या वेतनातून हा दंड कपात करुन या कारवाईचा आहवाल सादर करावा असे आदेश कुलगुरूंना देण्यात आले आहेत. सदर माहिती मागील दोन वर्षापासून मागितली जात होती.

विद्यापीठात असलेल्या पीएचडी विभागामार्फत पीएचडी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा लेखाजोखा ठेवला जातो. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि प्राध्यापकांची कमतरता यामुळे खूप समस्या निर्माण होत आहेत. तसेच पीएचडी विद्यार्थ्यांसाठी गाइड मिळत नसल्याने मोठी कसरत करावी लागते. यामुळे माजी प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अनेक प्राध्यापक पीएचडीसाठी पात्रच नाही असा अहवाल सादर केला. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी विद्यापीठात पीएचडीसाठी पात्र असलेले प्राध्यापक आणि पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती विभागाच्या जनमाहिती अधिकारी सहायक कुलसचिवांना मागवण्यात आली होती, पण ती दिली गेलीच नाही.

शेवटी राज्य माहिती आयोगाकडे झालेल्या सुनावणीत ३० दिवसांत माहिती द्यावी, असे आदेश देण्यात आले. मात्र, तरिही माहिती न दिल्यामुळे आयोगाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून तुम्हाला दंड का करण्यात येऊ नये, अशी विचारणा जनमाहिती अधिकारी तथा सहायक कुलसचिवांना करण्यात आली. त्यालाही उत्तर दिले गेले नाही. माहिती न देणे आणि आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यावर आयोगाने नाराजी व्यक्त करत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी आयोगाचा निर्णय व निर्देशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून माहिती अधिकार कायद्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याचे स्पष्ट दिसते, असा ठपका ठेवला.


ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा, 25 जणांवर गुन्हा

Next Post

तुम्ही माझे स्वप्न पूर्ण केले…! ‘बिग बॉस 14’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर भावूक झाली रूबीना दिलैक

Next Post

तुम्ही माझे स्वप्न पूर्ण केले...! 'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर भावूक झाली रूबीना दिलैक

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी – श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.