सातारा : सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास “स्वाभिमानी’ ने मारले जोडे


 

स्थैर्य, सातारा, दि.२ : कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नेले (ता. सातारा) येथे केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

श्री. शेळके म्हणाले, “”केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केली. ही विधेयके शेतकरीविरोधी असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी केंद्राच्या विरोधात दिल्लीत मोर्चा काढला आहे. या मोर्चात लाखो शेतकऱ्यांनी सहभागी होत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने बळाचा वापर करत हे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारच्या या प्रवृत्तीच्या निषेधार्थ साताऱ्यात केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!