• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पालकांनो विश्‍वास ठेवा आणि मुलांना शाळेत पाठवा

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 2, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.२ : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थी सुरक्षेबाबत शासन व शाळा सज्ज असतानाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दररोज शाळांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थी-शिक्षकांची थर्मलद्वारे तपासणी, मास्क बंधनकारक व सुरक्षित अंतर ठेवणे या सूत्रांचा वापर केला. कोरोनाची भीती आहे. परंतु, योग्य खबरदारी घेतल्यास सुरक्षित राहता येते, ही मानसिक तयारी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत दक्षता घेऊन शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यापासून कोरोना नियंत्रित आल्याने नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता, इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले. त्यानुसार सर्व शाळांत विद्यार्थी व शिक्षक बैठक व्यवस्था, विविध कार्यगट गठीत करणे, शारीरिक अंतर राखण्यासाठी शालेय परिसरात विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे, पालकांची संमतीपत्रे घेणे या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. 

सध्या जिल्ह्यातील एकूण 820 शाळांपैकी 726 शाळा सुरू आहेत. उर्वरित शाळाही टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. शाळा बंद असताना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला गेला. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्‍य नसल्याचे निदर्शनास आले. तसेच महत्त्वाच्या विषयांसाठी प्रत्यक्ष (ऑफलाइन) अध्यापनाची आवश्‍यकता असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 

पालकांनी जास्तीत जास्त संमतीपत्रे द्यावीत 

जिल्ह्यातील शाळांमधील सरासरी 40 टक्के पालकांनीच विद्यार्थी शाळेत पाठविण्यास संमतीपत्रे दिली आहेत. परंतु, अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे पालकांनी जास्तीत जास्त संमतीपत्रे शाळा प्रशासनाला द्यावीत. पालकांनीही शाळा प्रशासनावर विश्‍वास ठेऊन पाल्यांना शाळेमध्ये पाठवावे. विद्यार्थी व शिक्षक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षणाचे धडे नक्कीच गिरवतील, असाही विश्‍वास श्री. क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.


Tags: सातारा
Previous Post

विद्यार्थिनी कोरोनाबाधित झाल्याने ग्रामस्थांनी शाळाच ठेवल्या बंद

Next Post

सातारा : सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास “स्वाभिमानी’ ने मारले जोडे

Next Post

सातारा : सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास "स्वाभिमानी' ने मारले जोडे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!