स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे, मुंबईकरांनी वाढवली जिल्हय़ाची चिंता

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा जिल्हय़ात करोना  बाधितांचा आकडा वाढला मात्र नंतर त्याचा वेग मंदावला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच करोना  मुक्त होणाऱयांची वाढलेली संख्याही जिल्हय़ाला दिलासा देऊ लागली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसात पुण्या मुंबईहून जिल्हय़ात आलेले नागरिक बाधित म्हणून समोर येऊ लागल्याने जिल्हावासियांचा आणि प्रशासनाचा जीव टांगणीला लागला आहे. मंगळवारी रात्री सातारा शासकीय रुग्णालयात दाखल असणाया 58 व 31 कैद्यांचे 14 दिवसांनंतर चे दोन्ही अहवाल निगेटिव आल्याने त्यांना घरी सोडण्यात आली आहे. मंगळवारी खंडाळा तालुक्यातील एक, खटाव तालुक्यात 2 तर कराड तालुक्यातील म्हासोली गावात तब्बल पाचजण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली. ग्रामीण भागात करोना  ने केलेला शिरकाव चिंताजनक असून आता शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील काही दिवस घरात बसून करोना  चा संसर्ग टाळावा लागणार आहे. मुख्य म्हणजे संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. एका बाजूला मायक्रो कंटेनमेंट झोन वगळता जिल्हय़ाचे निर्बंध कमी झाल्याने लोकांची फिरती वाढली असताना वाढते रूग्ण चिंतेची बाब ठरले आहेत.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला  लोणंद येथे मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी (ता. खटाव) येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले  55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण 8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

लोक गेले शेतातील वस्तीत राहायला

बधितांच्या संपर्कात कोण कोण आले? याची माहिती गोळा करण्याचे काम  प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरू असताना मात्र गावकऱयांकडून माहीती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे करोना  ची  साखळी  शोधताना अडचण निर्माण होत असल्याचे तेथील अधिकाऱयांनी सांगितले आहे. गावाच्या चारीही बाजूने सीमा पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. करोना  चा वाढत असलेला आकडा पाहात अनेकांनी आपल्या कुटुंबासहित गावाच्या बाहेर असणाऱया शेतातील वस्तीवर  राहायला गेले आहेत. जेणे करून कोणाच्याही संपर्कात न येता  आपली  व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास सुरुवात केली असल्याचे पहावयास मिळत आहे

खंडाळय़ातील महिला मुंबईत बाधित, पाडळीत युवकाला लागण 

तर मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली 58 वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तीची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिह्यात गणाना केली जाणार नाही. मात्र तालुक्यातील पाडळी येथील मुंबईहून आलेला युवकही मंगळवारी कोरोना बाधित झाल्याने खंडाळा तालुका हादरला आहे.

लोणंदनजीक असलेल्या पाडळी गावातील एक तरूण काही दिवसांपूर्वीच मुंबई येथून आपल्या गावी आलेला होता. या तरुणाला स्थानिक प्रशासनाने 14 तारखेपासूनच होम क्वारंटाइन केलेले होते. आज सकाळी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने पाडळी गाव सील करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेले आठ जण हाय रिस्क मध्ये असून 26 जण लो रिस्कमध्ये आहेत. तहसीलदार दशरथ काळे, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील, सपोनि संतोष चौधरी यांनी भेट देऊन तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गावात पुणे, मुंबईहून 46 जण आले असून ते होम क्वारंटाईन आहेत.

मायणीत दोन रूग्ण, गाव सील..खटाव तालुक्यात चारच दिवसापूर्वी खरसिंगे येथे एक रुग्ण सापडला होता. मंगळवारी मायणी येथील 55 वर्षीय पुरूष आणि 48 वर्षीय महिला असे दोन रुग्ण आढळून आल्यामुळे मायणीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. हे रूग्ण अकोला येथून प्रवास करून आले होते. मायणी बाजारपेठ मोठी आसल्यामुळे मायणी परिसरातील अनेक खेडयातील लोक दैनंदिन खरेदीसाठी येतात. प्रशासनाने कडक अंमलबजावणी करूनही अनेक लोक खरेदीच्या निमित्ताने, दवाखान्याच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत. परंतु सकाळी दोन रुग्ण सापडल्याची वार्ता परिसरात पसरताच अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. मायणी गाव पूर्ण लॉकडाऊन केला असून प्रशासन लक्ष ठेऊन आहे.

क्वारंटाईन असलेल्यांनी नियम पाळलेच पाहिजेत..=सातारा जिल्हय़ातील विविध तालुक्यांमध्ये परवानगी घेवून तसेच विनापरवानगी आलेल्या नागरिकांची तपासणी करुन त्यांना होमक्वारंटाईन तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे ग्रामसमित्या, वॉर्ड समित्या करत आहेत. मात्र, या नागरिकांनीच क्वारंटाईन कालावधीत गावात, परिसरात न फिरता संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हा करोना  मुक्त करण्यासाठी आता सर्वांनीच काळजी घेण्याची गरज असून बाहेरुन आलेल्यांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन या लढाईत योगदान दिले पाहिजे. 


Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

सोनक्यातील युवकाची करोनावर मात

Next Post

राज्यात ‘कर्जत-जामखेड’ला नाफेडकडून कांदा खरेदी केंद्राचा पहिला मान

Next Post

राज्यात 'कर्जत-जामखेड'ला नाफेडकडून कांदा खरेदी केंद्राचा पहिला मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा ना. अजित पवार; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

March 1, 2021

‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा

March 1, 2021

विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द मोहीम तीव्र करणार गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

March 1, 2021

नेक्सझू मोबिलिटीने इलेक्ट्रिक सायकल रॉम्पस+ लॉन्च केली

March 1, 2021

शेंद्रे येथे मंगळवारी मधुमक्षिका पालन शिबीर

March 1, 2021

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी

March 1, 2021

गलवान हिंसेनंतर चीनने मुंबईच्या पॉवर सप्लाय सिस्टीमवर केला होता सायबर हल्ला

March 1, 2021

सुहास लिपारे यांचे निधन

March 1, 2021

कच्चा माल आमचा… पक्का पण आम्हीच करु…!!

March 1, 2021

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी; जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात धान्य वाटप व वृद्धश्रमास आर्थिक मदत

March 1, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.