• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आकाशात झेपावण्याआधीच पाळणे जमिनीवर पडून; मायणीत यात्रा-जत्रांवर निर्बंध

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 5, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मायणी (जि. सातारा), दि.५: राज्य सरकारने लॉकडाउन उठवून मिशन बिगीन अगेन सुरू केले. मात्र, गावोगावच्या यात्रा-जत्रांवर अद्याप निर्बंध असल्याने यात्राकाळात आबालवृद्धांचे आकर्षण असलेले आकाशी पाळणे अजूनही जमिनीवरच पडून असलेले दृष्टीस येत आहेत. परिणामी, आर्थिक नुकसानीमुळे पाळणे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. 

गेल्या मार्च महिन्यात येथील सद्‌गुरू यशवंतबाबा महाराज यात्रेसाठी विविध खेळणी व आकाशी पाळणे दाखल झाले होते. मात्र, उभारणी करण्यात येत असतानाच अचानक कोरोनामुळे यात्रा होणार नसल्याचे जाहीर झाले. लॉकडाउन सुरू झाल्याने पाळणे आकाशाच्या दिशेने झेपावण्याआधीच ते जमिनीवर पडून राहिले. त्यामुळे त्या एकमेव व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली. वाहतूक व जिल्हा हद्द बंदीने सर्व लवाजमा यात्रातळावरच पडून राहिला. गेल्या नऊ महिन्यांपासून पाळण्याचे साहित्य खराब होऊ लागले आहे. उत्पन्न नसताना आता साहित्याच्या नुकसानीची भर पडत आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो व्यावसायिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. 

याबाबत येथील खंडोबा माळावर अडकून पडलेले मोहोळ (जि. सोलापूर) येथील आकाशी पाळण्यांचे व्यावसायिक सुभाष चव्हाण म्हणाले, “”माचनूर (ता. पाटण) येथील यात्रा उरकून उस्मानाबाद येथील यात्रेसाठी सर्व साहित्य रवाना केले. सुमारे दोन लाख रुपये भाड्यापोटी द्यावे लागले. तेथे यात्रातळावर सामान उतरवले आणि तासाभरातच यात्रा भरणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथून अन्यत्र जाण्याचा निर्णय झाला. दरम्यान, मायणीत यशवंतबाबा यात्रा होणार असल्याचे समजले, तरीही खात्री करण्यासाठी कारभारी मंडळीची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत यात्रा होणारच, अशी खात्री कारभारी मंडळींनी दिली. त्यामुळे चार पैसे मिळतील या आशेने पुन्हा लाखभर भाडे खर्चून मायणीत सामान आणून उतरवले.

यात्रातळावर येण्यास विलंब झाल्याने लगेच साहित्याची जोडाजोडी करण्यास सुरवात केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले. परिणामी, पाळणे व खेळण्यांची जोडाजोडी थांबवली. तेव्हापासून आजअखेर कुटुंबातीलच कामगार नुसते आहेत. केवळ भाड्यापोटी लाखोंचे नुकसान झाले.” आता आर्थिक उत्पन्न नसताना दैनंदिन खर्च भागविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. शासनाने लवकरात लवकर काही निर्बंध घालून यात्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


Tags: सातारा
Previous Post

ग्रंथालयांना मिळणार 23.7 टक्के अनुदान; शासन मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

Next Post

जिल्ह्यातील 115 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 6 बाधितांचा मृत्यु

Next Post

जिल्ह्यातील 115 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 6 बाधितांचा मृत्यु

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!