स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

वीज नियामक आयोग अध्यक्षपदाची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात जावे लागेल : भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 26, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि. २६: वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांची सोय लावण्यासाठीच राज्य सरकारने घाईगडबडीत या पदासाठी मुलाखती घेण्याचे नाटक केले, असा आरोप भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व ऊर्जा विभागाचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे. ही संशयास्पद नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारने प्रयत्न केल्यास न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही श्री. पाठक यांनी दिला आहे.

श्री. पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील 2 कोटी 40 लाख वीज ग्राहकांना पुरेशा दाबाने व रास्त दराने वीज पुरवठा व्हावा या हेतूने वीज नियामक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया 2003 च्या वीज कायद्यात स्पष्टपणे नमूद केली आहे. त्यानुसार अध्यक्षपद रिक्त होण्यापूर्वी सहा महिने आधी ही प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, राज्याचा मुख्य सचिव आणि केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा एक अधिकारी अशा तीन जणांच्या निवड समितीने अध्यक्ष निवडावा अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र सरकारने ही तरतूद धाब्यावर बसवत आनंद कुलकर्णी हे अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर दीड महिन्यानंतर म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी निवड समिती नियुक्त केली. अध्यक्ष निवृत्त होण्यापूर्वी 6 महिने निवड प्रक्रिया सुरू व्हावी ही कायद्यातील तरतूद बाजूला ठेवली गेली. निवड समितीत मुख्य सचिवांच्या नव्हे तर अतिरीक्त मुख्य सचिवांचा समावेश करत पुन्हा कायदा बाजूला ठेवला गेला. एक कनिष्ठ अधिकारी आपल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या गुणवत्तेचे कसे मूल्यमापन करू शकतो ?

विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांची निवृत्तीनंतर वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठीच राज्य सरकारने घाईगडबडीत नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली आहे, असे दिसते आहे. अध्यक्षपदासाठी 81 अर्ज आले होते. या अर्जाची छाननी करण्यासाठी एक दिवसही पुरणार नाही. ही बेकायदा नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात जावे लागेल, असेही श्री.पाठक यांनी नमूद केले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

देशांतर्गत उत्‍पादनांना प्रोत्‍साहनासाठी आत्‍मनिर्भर भारत योजनेचा नागरि‍कांनी लाभ घ्‍यावा : अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजीव जाधव

Next Post

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान; 27 मार्चपासून मतदानाला सुरुवात, सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी होणार जाहीर

Next Post

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान; 27 मार्चपासून मतदानाला सुरुवात, सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी होणार जाहीर

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,027 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

April 17, 2021

अत्याचारी इंग्रजांना चाप लावणारे चाफेकर बंधू

April 17, 2021

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

April 17, 2021

रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

April 17, 2021

शासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी – दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

April 17, 2021

फलटण तालुक्यातील १६९ तर सातारा जिल्ह्यातील १५४३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३८ बाधितांचा मृत्यु

April 17, 2021

जिल्हाधिकारी महोदय, फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सहभागी करून घ्या; नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांची मागणी

April 17, 2021

सजाई गार्डन येथे उभारणार १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर; फलटणकरांच्या मदतीला धावून आले उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे

April 17, 2021

मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 17, 2021

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार

April 17, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.