• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मंत्र्यांनीच सुसंस्कृतपणा सोडला तर इतरांचे काय ?

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 8, 2022
in अग्रलेख, विशेष लेख, संपादकीय

राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे कोणीच सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती सध्याला निर्माण झालेली आहे. राज्यामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट जनादेश दिलेला होता. परंतु आपापसातील हेवेदाव्यामुळे किंवा मुख्यमंत्री पदावर कोण बसणार ? यासाठी दोघेही अडून बसल्याने राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार तयार झाले. त्यामध्ये खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यामध्ये आत्ता नुकतेच झालेले सत्तांतर सुद्धा संपूर्ण राज्याने बघितले आहे. भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेनेमधील 40 हून अधिक आमदार कसे गेले व त्या चाळीस आमदारांचा प्रमुख कसा मुख्यमंत्री झाला हे सर्वांनीच पाहिले आहे.

हे सर्व होत असताना तत्कालीन सत्ताधिकारी तत्कालीन विरोधक यांच्यामध्ये बरेच दावे व प्रतिदावे एकमेकांवर होत होते. परंतु काही अपवाद वगळता कोणीही खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणे टाळत होते. काल नुकतीच राज्यातील एका मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या एका महिला नेत्यावर कोणता शब्द वापरत टीका केली. आपली टीव्हीवर चालणाऱ्या न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना या सर्व गोष्टी पाहताना नक्की राज्याची संस्कृती कोणत्या दिशेला जात आहे, हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याला एक सुसंस्कृतपणाची संस्कृती आहे. राज्यातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करताना कधीही त्यांनी पातळी सोडलेली आढळलेली नाही. विद्यमान मंत्रीच जर असे बोलत असतील तर कार्यकर्त्यांनी यातून कोणता धडा घ्यायचा ? असे प्रश्न तयार होत आहेत.

देशातील इतर राज्य पाहता महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृतपणा कायमच जाणवत आलेला आहे. राज्यातील पूर्वीच्या नेत्यांनी सुद्धा कधी आपला सुसंस्कृतपणा सोडलेला नव्हता व आरोप करताना कधीही खालच्या पातळीला जाऊन आरोप झालेले या राज्याने पाहिलेले नाहीत. आता राज्यामध्ये सर्वच गोष्टी बदलत असताना दिसत आहेत. विद्यमान मंत्री जर अशा शब्दात बोलू लागले तर कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक काय करणार किंवा काय बोलणार हेही आता आगामी काळामध्ये राज्याला पाहावे लागणार आहे.

महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा संपूर्ण देशाने बघितलेला आहे. कट्टर विरोधात असताना सुद्धा स्व. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन यांची मैत्री सुद्धा संपूर्ण देशाने बघितलेली आहे. राजकारणाच्या ठिकाणी आरोप करताना प्रत्येक जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आलेले आहेत. परंतु खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे सर्वांनीच आज पर्यंत काही अपवाद वगळता पाळलेले होते. परंतु राज्याचे विद्यमान मंत्री जर खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतील, तर याबाबत कोण व कोठे आवाज उठवणार हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही.

राज्यामध्ये या पूर्वी आपल्या प्रदेशातील बोलीभाषेमध्ये अनेक नेते बोललेले आढळून आले आहेत. परंतु दुसऱ्या पक्षातील नेत्यावर त्यामध्ये सुद्धा महिला नेत्यावर बोलताना टीका अनेक जणांनी केलेल्या आहेत. परंतु विद्यमान मंत्री पातळी सोडून कोणीही महिला नेत्यांवर बोललेले नाही. भारतीय जनता पक्ष हा एक विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु आता जर भारतीय जनता पार्टी ज्या वेळी सरकार मध्ये आहे. त्यावेळी नेमके आता त्यांच्या मंत्र्याचे समर्थन करणार कि त्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार ?. यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जरी तो मंत्री भारतीय जनता पार्टीचा नसला तरीही भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये तो मंत्री आहे. त्यामुळे नक्की भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असेल, हेच महत्वाचे ठरणार आहे.

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे,
संपादक, दैनिक स्थैर्य


Previous Post

साताऱ्यात मंत्री अब्दूल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; महिला कार्यकर्त्यांनी मारले पुतळय़ास जोडे

Next Post

साताऱ्यात शनिवारी निशंक राष्ट्रीय महोत्सव

Next Post

साताऱ्यात शनिवारी निशंक राष्ट्रीय महोत्सव

ताज्या बातम्या

सरकारी भरतीतील खाजगीकरणाचा जी.आर. तात्काळ रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा

मार्च 21, 2023

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात

मार्च 21, 2023

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत

मार्च 21, 2023

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात – नितेश राणे

मार्च 21, 2023

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

मार्च 21, 2023

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मार्च 21, 2023
वडूज ता.खटाव येथील भूमी अभिलेख कार्यालय फलका नजीक पडलेल्या रिकाम्या बाटल्या

वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण?

मार्च 21, 2023

शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष

मार्च 21, 2023

रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

मार्च 21, 2023

महिला बचत गट उत्पादित वस्तुंचे २४ ते २६ मार्च कालावधीत प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मार्च 21, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!