• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘लालपरी’शिवाय शाळा-कॉलेजला जायचं कसं?, विद्यार्थ्यांचा प्रशासनाला सवाल

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 18, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मायणी (जि. सातारा), दि.१८ : कोरोनामुळे बंद असलेली शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील एसटी बसफेऱ्या अद्याप सुरू करण्यात आल्या नसल्याने “लालपरी’शिवाय शाळा कॉलेजला जायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावू लागला आहे. 

शालेय शिक्षण विभागाने दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सुमारे आठ महिन्यांपासून घरीच बसून कंटाळलेले विद्यार्थी आनंदून गेले आहेत. कधी एकदा शाळा कॉलेजला जातोय असे वाटू लागले आहे. अनेक जण शाळा, कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुक्तपणे कशी मौजमजा करायची याबाबत स्वप्ने रंगवू लागले आहेत, तर मुले शाळा, कॉलेजला जाणार असल्याच्या विचाराने पालकांचाही ताण कमी होऊन हलके वाटू लागले आहे. दीपावलीबरोबरच आता शाळा-विद्यालयांत जाण्यासाठीची तयारी व त्यासंबंधीची चर्चा घरोघरी सुरू झाली आहे. मात्र, शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर उभे ठाकले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना पालकांनी स्वतः वाहनाने शाळा-विद्यालयात आणून सोडायचे आहे. मात्र, अनेक पालकांकडे वाहनांची सोय नाही. असे पालक मुलांना शाळा विद्यालयात पोचविणार कसे? याची चिंता पालक व शाळा व्यवस्थापनांना लागली आहे. 

दरम्यान, एसटी बस गाड्या राज्यभर सुरू झाल्या असल्या, तरी अपवाद वगळता केवळ लांब पल्ल्याच्याच गाड्या सुरू असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सद्यःस्थितीत खेड्यापाड्यातील, वाड्यावस्त्यांवरील सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाची गैरसोय तर आहेच; पण बसअभावी ग्रामीण भागातील मुले व विशेषत: मुली शाळा, विद्यालयात पोचणार कशा? हा प्रश्न अधिक गंभीर आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील बस फेऱ्या पूर्ववत व नियमित सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. म्हणून शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू होण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा ऑनलाइन शिक्षणाप्रमाणे ठराविक विद्यार्थीच प्रत्यक्ष शाळा कॉलेजमध्ये येऊन ऑफलाइन शिक्षणाचा लाभ घेतील. ऑनलाइनपासून वंचित असलेले विद्यार्थी ऑफलाइन शिक्षणालाही मुकण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापनाकडून होत आहे.


Tags: सातारा
Previous Post

संकल्प अभ्यास वर्गात उत्साहात जागतिक बालदिन साजरा करण्यात आला

Next Post

‘चलो आज आदमी से फरिश्‍ते बन जाये, एक पक्षी की जान बचाएं’; ‘पक्षी वाचवा’चा 15 गावांत संदेश

Next Post

'चलो आज आदमी से फरिश्‍ते बन जाये, एक पक्षी की जान बचाएं'; 'पक्षी वाचवा'चा 15 गावांत संदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जिंती येथे एकास नऊ जणांकडून मारहाण

मे 29, 2023

निंबळकजवळ बुलेट गाडीच्या अपघातात युवक ठार

मे 29, 2023

महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

मे 29, 2023

वाठार फाटा येथील अपघातात दोघे जखमी

मे 29, 2023

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; उपळवे येथील घटना

मे 29, 2023

पृथ्वी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक पोलीस असून अडचण नसून खोळंबा

मे 29, 2023

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल – डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

पालखीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

मे 29, 2023

नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळा हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण : खासदार रणजितसिंह

मे 29, 2023
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे विध्यार्थी

“पुरानी जीन्स ओर गिटार” १६ वर्षानंतर भेटले जुने मित्र

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!