स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्कार, फोटोसेशनसाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ; मी पुन्हा येईन म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा काढता पाय

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 10, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, धुळे, दि.१०: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील मंगळवारी पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त शहरातील राष्ट्रवादी भवनात आले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांनी सत्कार व फाेटाे सेशनवेळी बेशिस्तीचे दर्शन घडवले. त्यामुळे दुपारी दाेन वाजेपासून थांबलेल्या कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या कामाचा अाढावा न घेता मी पुन्हा येईन असे अाश्वासन देत मंत्री जयंत पाटील यांनी काढता पाय घेतला. ते केवळ दहा ते पंधरा मिनिट राष्ट्रवादी भवनात थांबले. या वेळी सत्कार व फाेटाे काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी रेटारेटी केली. त्यामुळे एकनाथ खडसेही हतबल झाल्याचे दिसून अाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा चाळीसगाव येथील कार्यक्रम लांबला. त्यामुळे त्यांना शहरात येण्यास विलंब झाला. ते चार वाजेच्या सुमारास आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सायंकाळी सहा वाजता ते राष्ट्रवादी भवनात पाेहाेचले. याठिकाणी दुपारी दाेन वाजेपासून कार्यकर्ते त्यांची वाट पाहत थांबले हाेते. तसेच वरच्या मजल्यावरील सभागृहात पक्षाच्या विविध अाघाडी, सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्री पाटील आढावा घेणार होते. जयंत पाटील राष्ट्रवादी भवनात आल्यावर कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी रेटारेटी सुरू केली. शहर जिल्हाध्यक्ष रणजित भाेसले यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पायऱ्यावर काही जुने कार्यकर्ते, नगरसेवकांनी हार घालून सत्कार केला. मंत्री पाटील यांना हार घालण्यासाठी व फाेटाे काढतांना गाेंधळ झाला. या गोंधळातच मंत्री पाटील अाणि इतर पदाधिकारी राष्ट्रवादी भवनाच्या वरच्या मजल्यावर पाेहाेचले. त्याठिकाणी दुपारपासून कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला थांबल्या होत्या. व्यासपीठावर अनिल गाेटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी बसलेले हाेते. जयंत पाटील येताच पुन्हा तेथे रेटारेटी झाली. त्या गाेंधळात काँग्रेसचेही काही कार्यकर्ते सत्कारासाठी पुढे अाले. त्यांनी सत्कार केला.

सभेत गोंधळ
सभेत गोंधळ

त्यानंतर अनेकांनी व्यासपीठाजवळ जयंत पाटील यांचा सत्कार करण्यासह फाेटाे काढण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी माईकचा ताबा घेतला. कार्यकर्त्यांना पाच ते सहा मिनिट मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अन्यायाविरूध्द, शहराच्या विकासासाठी अाक्रमक व्हावे. शहरात चांगले कामे झाली पाहिजे. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे स्पष्ट करत अाढावा घेण्यासाठी मी पुन्हा येईल असे सांगत कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतला. त्यानंतरही सत्कारासाठी कार्यकर्त्यांचा गाेंधळ सुरूच हाेता. त्यामुळे मंत्री पाटील यांना भवनातून बाहेर पडण्यासाठी दहा मिनिटे लागली. परिवार संवादासाठी अालेल्या मंत्री जयंत पाटील यांनी दहा मिनिटांच्या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष रणजित भाेसले यांच्या संघटन काैशल्याचे काैतुक केले.

गोटे, शिंदे व पाटलांमधील मतभेद मिटवा; कार्यकर्त्यांनी केले आवाहन

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे व जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्यात पक्षांतर्गत मतभेद आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची वाढ खुंटली आहे. पक्षवाढीसाठी अचडणी निर्माण झाल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये देखील गट पडले आहेत. गतवैभव प्राप्त होण्यासाठी अनिल गोटे आणि किरण शिंदे व किरण पाटील यांच्यातील मतभेत संपुष्टात आणावेत, असे आवाहन कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केले.

केशरानंद गार्डन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवती प्रदेश सक्षणा सरगर, समन्वयक सुरज चव्हाण,कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, संदिप बेडसे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, सचिव सुरेश सोनवणे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पोपटराव सोनवणे, सत्यजित सिसोदे, कुणाल पवार, मयूर बोरसे, प्रा.सुवर्णा शिंदे, एन. सी. पाटील, गटनेते कमलेश देवरे,अनिल मुंदडा, रईस काझी, कैलास चाैधरी उपस्थित हाेते. जयंत पाटील यांनी शहराध्यक्ष रणजित भोसले यांच्या कामाचे कौतुक केले. तर किरण शिंदे व किरण पाटील यांना ग्रामीण भागात अजून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. कदमबांडे यांनी पक्ष का सोडला हे अजून समजलेले नाही, त्यांनी पक्ष मोठा केला. त्यांना पक्षाने देखील भरभरून दिले. कदमबांडे यांच्या जागेवर अनिल गोटे पक्षात आले आहेत. त्यांनी संघटना बांधणीचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे सांगत गोटे यांच्या कामाचे कौतुक केले. मेळाव्यात पक्ष कामगिरीचा आढावा सुरू असताना कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणत सर्व आंदोलक शेतकऱ्यांची केलेली हेटाळणी निंदनीय आहे. पंतप्रधानांवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घणाघात केला.

गाेटे स्पष्ट बाेलत असल्याने हाेते अडचण

काही मिनिटांच्या भाषणात अनिल गाेटे यांचाही उल्लेख जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले की, अनिल गाेटे यांच्यासारखे अाक्रमक नेते पक्षात अाहे. ते स्पष्ट बाेलतात. त्यामुळे अनेकांना त्यांचा रागही येताे. मात्र, काही वेळानंतर त्यांचा राग शांत हाेताे. त्यांच्या बाेलण्यामुळे पदाधिकाऱ्यांना काम करतांना अडचणी येत असतील, असे सांगत त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असाही सल्ला मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बैठकीला दोन्ही गटाचे कार्यकर्ते…

कार्यक्रमाला अनिल गाेटे, माजी मंत्री एकनाथ खडसे, उन्मेष पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. शिंदखेडा तालुक्यात गाेटे अाणि बेडसे यांच्यात हाेणारी पत्रकबाजी व गटबाजीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बैठकीला अनिल गाेटे यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित हाेते.

व्यासपीठासमोर कार्यकर्त्यांचा राडा

मेळाव्यादरम्यान, भूषण पाटील यांनी पक्षांतर्गत नेते व कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या परस्परविरोधी कारवायांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नवलाणे (ता.धुळे) या ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वैरभाव ठेवून पक्षातील कार्यकर्त्यांनी कसे आपसातच एकमेकांच्या विरोधात काम केले, याचा पाढा वाचला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पाठीमागून येत भूषण पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या हातातील माईक देखील हिसकावला. यावेळी त्यामुळे मेळाव्यात प्रचंड गोंधळ उडाला.


ADVERTISEMENT
Previous Post

शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रशासनाला सूचना

Next Post

साताऱ्यात चार शिवशाही बसने एकामागोमाग घेतला पेट, अग्नीशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Next Post

साताऱ्यात चार शिवशाही बसने एकामागोमाग घेतला पेट, अग्नीशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.