• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा : प्रकाश आंबेडकर

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 24, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.२४ : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रश्‍नावर तोडगा निघण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने फ्री शिप आणि स्कॉलरशिप असे दोन पर्याय असलेला अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला आमचा पाठिंबा असून मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ऍड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले. 

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, पदवीधर मतदार संघातील उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. सम्राट शिंदे उपस्थित होते. ऍड. आंबेडकर म्हणाले, पुणे विभागाच्या दोन्ही मतदार संघातील निवडणुकीसाठी वंचितच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आम्ही ही निवडणूक मुद्दा घेवून लढत आहोत. पडीक उमेदवारांच्या पुर्नवसानासाठी हे दोन मतदारसंघ प्रस्थापित पक्षांनी निवडलेले आहेत. या पडीक उमेदवारांचा पदवीधर आणि शिक्षकांनी कोणताही विचार करु नये. शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल झाला पाहिजे, यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. 

48.5 मिलियन डॉलरची कमाई करुन अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. वेळ मारुन नेण्यासाठी राज्य सरकारने फ्री शिप आणि स्कॉलर शिपचा पर्याय असणारा अध्यादेश काढला आहे. त्यास आमचा पाठिंबा राहिल. शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी भरती प्रक्रिया राबवावी. ती राबवत असताना उमेदवारांकडून सदरची नियुक्‍ती सर्वोच्च न्यायालयाच्या भविष्यातील आदेशावर अवलंबून राहिल असे लिहुन घ्यावे किंवा 16 टक्के जागा राखून ठेवत उर्वरित भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असा पर्याय आम्ही सरकारला दिला आहे. या पर्यायावर सरकारने निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केले.


Tags: सातारा
Previous Post

मल्हारपेठेत आजारी बिबट्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल!

Next Post

48.5 मिलियन डॉलरची कमाई करुन अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

Next Post

48.5 मिलियन डॉलरची कमाई करुन अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!