स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा : प्रकाश आंबेडकर

Team Sthairya by Team Sthairya
November 24, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.२४ : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रश्‍नावर तोडगा निघण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने फ्री शिप आणि स्कॉलरशिप असे दोन पर्याय असलेला अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला आमचा पाठिंबा असून मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ऍड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले. 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, पदवीधर मतदार संघातील उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. सम्राट शिंदे उपस्थित होते. ऍड. आंबेडकर म्हणाले, पुणे विभागाच्या दोन्ही मतदार संघातील निवडणुकीसाठी वंचितच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आम्ही ही निवडणूक मुद्दा घेवून लढत आहोत. पडीक उमेदवारांच्या पुर्नवसानासाठी हे दोन मतदारसंघ प्रस्थापित पक्षांनी निवडलेले आहेत. या पडीक उमेदवारांचा पदवीधर आणि शिक्षकांनी कोणताही विचार करु नये. शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल झाला पाहिजे, यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. 

48.5 मिलियन डॉलरची कमाई करुन अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. वेळ मारुन नेण्यासाठी राज्य सरकारने फ्री शिप आणि स्कॉलर शिपचा पर्याय असणारा अध्यादेश काढला आहे. त्यास आमचा पाठिंबा राहिल. शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी भरती प्रक्रिया राबवावी. ती राबवत असताना उमेदवारांकडून सदरची नियुक्‍ती सर्वोच्च न्यायालयाच्या भविष्यातील आदेशावर अवलंबून राहिल असे लिहुन घ्यावे किंवा 16 टक्के जागा राखून ठेवत उर्वरित भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असा पर्याय आम्ही सरकारला दिला आहे. या पर्यायावर सरकारने निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केले.

Related


Tags: सातारा
Previous Post

मल्हारपेठेत आजारी बिबट्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल!

Next Post

48.5 मिलियन डॉलरची कमाई करुन अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

Next Post

48.5 मिलियन डॉलरची कमाई करुन अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूल सातारा येथे उत्साहात साजरी

August 19, 2022

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

August 19, 2022

अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 19, 2022

गोपाळकाला, दहीहंडीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

August 19, 2022

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 19, 2022

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

August 19, 2022

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

August 19, 2022

जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत तोडगा काढणार – ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन

August 19, 2022

प्रवचने – आपल्याला देवाची नड वाटते का ?

August 19, 2022

अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी – सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

August 19, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!