स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजिंक्यताऱयाने अनुभवला शाही स्वाभिमान दिवस जगात प्रथमच किल्यावर पालिकेची झाली विशेष सभा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 13, 2021
in सातारा जिल्हा
अजिंक्यताऱयाने अनुभवला शाही स्वाभिमान दिवस जगात प्रथमच किल्यावर पालिकेची झाली विशेष सभा
ADVERTISEMENT


स्थैर्य, सातारा, दि.१३:  झेंडूच्या फुलांनी सजवलेला किल्ले अजिंक्यतारा, राजसदरेवर काढलेल्या रांगोळय़ा, सनईचा मंजूळ स्वर, तुताऱयांचा निनाद, अशा शिवमय वातावरणात किल्ले अजिंक्याताऱयावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहु महाराज यांचा राज्याभिषेक व सातारा शहराचा स्थापना दिन तथा 11 वा सातारा स्वाभिमान दिवस शाही पद्धतीने उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात किल्ल्यावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा देशात पहिला मान साताऱयाला मिळाला. या सभेत अजिंक्यताऱयांच्या विकासाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

दरम्यान, छत्रपती शाहु महाराजांच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करणारे अजय जाधवराव, राजुशेठ राजपुरोहित यांचा सवयभान चळवळीचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते सातारा भूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने किल्ले अजिंक्यताऱयावर सातारा स्थापना दिन व सातारा स्वाभिमान दिन उत्साहात शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, सुजाता राजेशिर्के, स्मिता घोडके, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, ऍड. दत्ता बनकर, शेखर मोरे-पाटील, निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, संस्थापक अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, मनसेचे सातारा शहरप्रमुख राहुल पवार, भाजपाच्या दीपा झाड, दीपक भुजबळ, शिवभक्त अभि सुर्वे, मंगेश काशिद, सातारा सायकल ग्रुपचे संतोष शेडगे, डॉ. दीपक थोरात व सदस्य उपस्थित होते.

अजय जाधवराव म्हणाले, मातृसंस्था असलेल्या सातारा पालिकेची सभा होण्याचा मान भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अजिंक्यतारा गडाला मिळतोय. याला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण या किल्ल्याला आमच्यासाठी काशी विश्वेश्वराइतकच महत्व आहे. या किल्यावर महाराजसाहेब शहाजीराजे यांच्यापासून ते शाहु महाराजांपर्यंत प्रत्येक छत्रपती परंपरेचे पदस्पर्श लागलेले आहेत. तथापि अजिंक्यताऱयाचे महत्व वाढवलं ते छत्रपती शाहू महाराजांनी. त्यांनी सातारा शहराची निर्मिती केली. शहराला ग्रामदैवत नाही कारण सातारा हे खेडं नव्हतं. साताऱयाचे देणं आहे. त्याच छत्रपती शाहू महाराजांची समाधी माहुलीला आहे. तिच्या जीर्णोद्धाराचा पहिला नारळ याच कार्यक्रमात तीन वर्षापूर्वी फुटला. राजू शेठ भारावले अन् त्या समाधीचा मुहूर्त रचला. नदी पत्रात समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे त्यांनी सांगत सातारा पालिकेच्या नव्या वास्तूत छत्रपती शाहु महाराजांचे स्मारक असावे अशी भावना व्यक्त केली.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. संदीप मंहिद गुरुजी म्हणाले, मी सात वर्षापासून येतो आहे, ज्या भूमीत आपण वाढलो अशा सातारा नगरीचा या उत्सवात प्रत्येकाने आले पाहिजे. म्हणून गेल्या दहा वर्षांपासून येतोय ध्यासात कमी झालं नाही. 1674 चा शिवछत्रपतींचा राज्यभिषेक झाला. स्वतंत्र म्हणजे काय हे अनुभवले. तो सोहळा रायगडावर पार पडला, तिस्रया छत्रपतीचा राज्यभिषेक याच किल्यावर पार पडला. त्याच किल्ल्यावर आपण स्वाभिमान दिवस साजरा करत आहोत आपण भाग्यवान आहोत. खरे तर सगळे योग असतात, या आपल्या पालक संस्थेच्या माध्यमातून दुर्गावर कुठेही सर्वसाधारण सभा होत नाही.या सातारा नगरपालिकेची सभा होतेय याचा अभिमान आहे.

दीपक प्रभावळकर म्हणाले, आधी बारा वर्षे गडावर काम केलं आणि मग प्रत्यक्ष उत्सवाला सुरुवात केली. अशी बावीस वर्ष या स्वाभिमान दिनामागे इतिहास आहे. यंदा बातमी नाही पोस्ट नाही बॅनर नाही, स्वाभिमान दिनाचा उत्सव होत आहे. योगायोगाने हद्दवाढ झाली अन ज्या अजिंक्यताऱयाहने दिल्ली राखली, अटक राखली तेथेच सभा पालिकेने घेतली. किल्यावर सभा घेणारी नगरपालिका प्रथमच आहे. छत्रपती शाहू महाराज राज्यभिषेक दिन शासनाच्या कागदावर आणण्याचा प्रयत्न सफल झाला. भविष्यात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळांची बैठकही अजिंक्यताऱयावर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 1 लाख रुपयांची मदत

किल्ले अजिंक्यताऱयाला उर्जिंतावस्था आणण्यासाठी पालिकेने घेतलेल्या ठरावानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, 11 वा हा स्वाभिमान दिन साजरा होत असून याला ऐतिहासिक महत्व आहे. ऍड. बनकर यांनी जो महत्वाचे विषय मांडला अजिंक्यताऱयाच्या संर्वर्धनाचा तो खूप महत्वाचा आहे. सर्वतोपरी सहकार्य बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना समितीच्या वतीने किल्ल्यावरील पहिली सभा आयोजित करण्याच्या प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

संशयितांचे 67 अहवाल कोरोनाबाधित

Next Post

यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदर कपात

Next Post
यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदर कपात

यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदर कपात

ताज्या बातम्या

उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

कोळकीत ग्रामपंचायत निवडणूकीत अनपेक्षित निकाल; भाजपची सपशेल धुलाई; अनेक ठिकाणी राजे गटाच्या बंडखोर उमेदवारांची सरशी

January 18, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

January 18, 2021
पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

January 18, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

January 18, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

January 18, 2021
शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

January 18, 2021
मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

January 18, 2021
भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.