• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

यशस्वी होण्यासाठी ध्यान योगसाधना महत्त्वाची कार्याधिकारी हनुमंत पाटील यांचे मत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 15, 2023
in बारामती

दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२३ । बारामती । यशस्वी होण्यासाठी ध्यान योगसाधना महत्त्वाची ठरते, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विशेष कार्याधिकारी हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील योग महाविद्यालयातर्फे ध्यान योगसाधनेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पाटील बोलत होते.

प्रथम पुष्पामध्ये डॉ. नीलेश महाजन यांनी मध्यान योगफ या विषयावर ध्यानाच्या प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले व मेंदूला चालना देणारी काही क्रिया करून घेतल्या.

द्वितीय पुष्पामध्ये हनुमंत पाटील म्हणाले की, ऋषिमुनींनी त्यांच्या अपार ध्यानशक्तीच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहचविले आहे. मन हे चंचल असते, त्यावर नियंत्रण मिळवणे आणि त्याला आपला मित्र करून घेणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. मनाच्या आरोग्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात दिवसातले पंधरा मिनिटे तरी घालविले पाहिजेत. स्वतःचा शोध घेतला पाहिजे, त्यासाठी ध्यान योगसाधना महत्त्वाची आहे.

स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या जीवनाचे प्रेरणामूल्य मोजण्यासाठी कोणतेही मोजमाप नाही. आजच्या युवकांनी त्यांचे विचार आदर्श मानून जीवनाला, समाजाला दिशा द्यावी. आपली संस्कृती ही आदर्श आहे. स्वामीजींच्या विचारांनी भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली. त्यांचे धर्म, प्रार्थना आणि ज्ञान यांचे विवेचन त्यांनी जगासमोर योग्य प्रकारे मांडले. आजचे युवक हे उद्याचा देश घडविणार आहेत, त्यामुळे स्वामीजींनी युवकांना सांगितलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या विचारांचा अवलंब केला पाहिजे आणि त्यांना अपेक्षित युवक होऊन स्वतःला, समाजाला व देशाला दिशा द्यावी, असे मत डॉ. भक्ती महाजन यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन स्मिता कदम यांनी केले. नीतू साळुंखे यांनी आभार मानले.


Previous Post

दि. 16 ते 22 जानेवारी या कालावधीत फलटण इंजिनिअरिंग कॉलेजचे जावलीत विशेष श्रमसंस्कार शिबिर

Next Post

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समितीच्या वतीने भदन्त विमलकित्ती गुणसिरी यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समितीच्या वतीने भदन्त विमलकित्ती गुणसिरी यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

फेब्रुवारी 4, 2023

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!