स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तिढा सुटला:अखेर ठरलं; फायनलच्या प्रॅक्टिकल्स 15 सप्टेंबरपासून, लेखी परीक्षा ऑक्टोबरमध्ये, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
तिढा सुटला:अखेर ठरलं; फायनलच्या प्रॅक्टिकल्स 15 सप्टेंबरपासून, लेखी परीक्षा ऑक्टोबरमध्ये, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, मुंबईकोरोना, दि. ४: संसर्गामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा निर्णय झाला असून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. तसेच राज्यातील सर्व सीईटीच्या तारखा दोन दिवसांत ठरवण्यात येतील, असेही सामंत यांनी सांगितले. १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकतात, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येतील. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता यावी यासाठीचे नियोजन करण्यासंदर्भात राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. तसेच परीक्षा सोप्या पद्धतीने होणार आहेत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सर्व कुलगुरू यांची ऑनलाइन पद्धतीने आज राजभवनात बैठक पार पडली. त्यात कुलगुरू समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्री सामंत यांनी बैठकीतील निर्णयाविषयी सांगितले.प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात महाविद्यालयात यावे लागू नये, अशी पद्धत अवलंबली जाणार आहे. परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय कुलगुरू समिती आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय विचाराधीन आहेत. त्यावर चर्चा सुरू असून सोपी पद्धत वापरण्यावर कुलगुरू समिती आणि उच्च, तंत्रशिक्षण विभाग व राजभवन यांच्यात एकमत झाल्याचे सामंत म्हणाले.

परीक्षा पद्धतीवर आज निर्णय

परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने होणार याची माहिती शुक्रवार, ४ रोजी जाहीर केली जाईल. पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय करायचे याबाबतही लवकरच निर्णय होईल. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात परीक्षांबाबत काही विसंगती नाही. विद्यार्थ्यांनी संभ्रम न बाळगता अभ्यासाला लागावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.

३१ आॅक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी

परीक्षा प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह पूर्ण करावी. व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर समितीचा अहवाल ठेवून दोन दिवसांत शासनास कळवावे. राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी. व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये यासंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून विद्यापीठांनी परीक्षा पद्धती निवडावी. -भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू

पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासंदर्भात तयारी पूर्ण करावी. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास अशा विद्यार्थांच्या परीक्षेचे नियोजन करण्यात यावे, असा निर्णय बैठकीत झाला.

31 ऑक्टोबरपर्यंत निकाल, घरी बसून अन् सोपी पद्धती असणार

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविड परिस्थिती, परीक्षांचे नियोजन यूजीसीला कळवणार

राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सध्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळवण्यात येईल, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, राज्यपालांसोबतच्या बैठकीस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

सीईटीच्या तारखा लवकरच

उच्च व तंत्रशिक्षण विभाग विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) १ आॅक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे नियोजन आखत आहे. त्यासंदर्भात दोन दिवसांत तारखा जाहीर होणार आहेत. मात्र दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

बेळगाव:पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामफलकाचे जल्लोषात अनावरण, छत्रपती शिवाजी चौक नाव कायम ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारची मध्यस्ती

Next Post

मुख्यमंत्र्यांना टोला:एकच विनंती, मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावे; राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचा टोला

Next Post
मुख्यमंत्र्यांना टोला:एकच विनंती, मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावे; राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचा टोला

मुख्यमंत्र्यांना टोला:एकच विनंती, मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावे; राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचा टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

कोळकीत राष्ट्रवादीचीच सत्ता अबाधित राहणार : दत्तोपंत शिंदे

अनिर्णित लढतीत चिठ्ठी द्वारे सौ.प्राजक्ता सागर काकडे विजयी

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

कोळकीत ग्रामपंचायत निवडणूकीत निकाल; भाजपची सपशेल धुलाई; अनेक ठिकाणी राजे गटाच्या बंडखोर उमेदवारांची सरशी

January 18, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

January 18, 2021
पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

January 18, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

January 18, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

January 18, 2021
शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

January 18, 2021
मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

January 18, 2021
भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.