उष:काल प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. हेमंत बेडेकर यांना पुरस्कार


’उषःकाल प्रतिष्ठान’ च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील एका मान्यवर व्यवतीस ’उषःकाल सन्मान’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. गतवर्षी अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांना तर यावर्षी डॉ. हेमंत बेडेकर यांना सोमवार (दि. 23) जून रोजी सकाळी 11.00 नवलभाई मंगल कार्यालय येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यानिमित्त….

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या फलटण शाखेच्या मार्गदर्शक कार्यकर्त्या व परिषदेच्या माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कै. सौ.उषा दाणी-विभुते यांच्या स्मरणार्थ ’उषःकाल प्रतिष्ठान’ च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील एका मान्यवर व्यवतीस ’उषःकाल सन्मान’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. रोख राक्रम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कै. सौ.उषा दाणी-विभुते या मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थीनी होत्या तेथेच त्यांना शिक्षिका होण्याची संधी मिळाली. त्यानंतर संस्थेत त्या प्राचार्यपदी सेवा करून निवृत्त झाल्या. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचे शिक्षण, विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेच्या माध्यमातून दिले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदस्थ डॉक्टर, वकील ही पदे भुषवित आहेत.

विद्यार्थी परिषद, लायनेस क्लब ऑफ, फलटण, विज्ञान शिक्षक संघ आणि ब्राह्मण संघटना अशा विविध माध्यमातून दाणी बाईनी सामाजिक कार्य केले होते. सामाजिक बांधीलकी त्यांनी आयुष्यभर त्यांनी जोपासली होती. कुठलेही काम त्यांनी फळाची अपेक्षा न करता केले. नोकरीमध्ये असताना पगार किती आहे, याचा विचार त्यांनी केला नाही. विद्यार्थी तयार करणे हेच त्यांचे ध्येय होते. निवृत्ती नंतरही त्यांनी सामाजिक कामामध्ये सहभाग घेतला होता. आजारी असताना प्रकृतीची काळजी न करता आलेल्या व्यक्तीला सल्ला देत होत्या.

विद्यार्थी चळवळीतून तयार झालेले सर्व श्रीपाद विभुते, संजय श्रीखंडे, संजय चिटणीस, संजय पालकर, जयंत सहस्त्रबुद्धे, रविंद्र फडतरे, हेमंत रानडे, मकरंद लेले, अ‍ॅड. बाळ पंडीत, प्रा.श्रीकांत काशिकर, डॉ. प्रसाद जोशी, मंगेश दोशी, आणि सौ. मृदुहासिनी भिडे, सौ. धरित्री जोशी यांनी एकत्र येवून या प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे.

दिनांक 23 जून 2016 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी, हितचिंतकानी व कुटुंबियांनी एकत्रित येऊत त्यांच्या नावाने सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ’उषःकाल प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या माध्यमातून आजवर डॉ. माधवराव पोळ (आर्ट ऑफ लिव्हींग मधील उल्लेखनिय कार्य), डॉ. अविनाश, पोळ, (पाणी फौंडशनचे कार्यातील विशेष सहभाग), डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (अपारंपारीक उर्जा क्षेत्रातील संशोधन व विकास कार्य) आणि मा. अरूण करमकर (पत्रकारीकेतील उल्लेखनिय कार्य) आणि मा. अंजलीताई देशपांडे, पुणे (महिला सबलीकरण) यांना सन्मानीत करणेत आले आहे.


Back to top button
Don`t copy text!