• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने चर्चा: कोयनेच्या चौथ्या टप्प्याचे खासगीकरण

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 14, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, दि.१४ : केंद्र सरकारच्या प्रस्तावित
विद्युत सुधारणा विधेयक २०२० नुसार ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार
आहे. महाराष्ट्रात या विधेयकाची अंमलबजावणी करताना कोयना प्रकल्पाच्या
चौथ्या टप्प्याचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी चौथ्या टप्प्याची पाहणी केल्यानंतर या चर्चेला आणखी बळ
मिळाले आहे. 

राज्यातील दिवसभराच्या वीज वापराचा आलेख पाहिल्यानंतर सकाळी व संध्याकाळी
विजेची गरज जास्त भासते. म्हणून विजेच्या अधिक मागणीच्या काळात जास्त वीज
उत्पादन करण्याच्या दृष्टीने कोयना प्रकल्पाच्या ‘टप्पा ४’ची उभारणी
करण्यात आली. त्यासाठी १ हजार ४६७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या
टप्प्यामध्ये २५० मेगावॉट क्षमतेचे चार संच बसवले आहेत.

मागणीच्या काळात एक हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. १९८५ मध्ये सुरू
झालेला हा प्रकल्प २००० मध्ये कार्यान्वित झाला. २००६ मध्ये राज्य वीज
महामंडळाचे चार कंपन्यांमध्ये रूपांतर झाले. तेव्हापासून कोयनेच्या चौथ्या
टप्प्याचे खासगीकरण होणार, अशी चर्चा सुरू आहे. आता केंद्र सरकारने विद्युत
सुधारणा विधेयक २०२० आणले आहे. त्यामुळे पुन्हा या टप्प्याच्या
खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. १० डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी कोयना प्रकल्पाची पाहणी करून वीज निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली.
मुख्यमंत्र्यांनी चौथ्या टप्प्याची पाहणी नेमकी कशासाठी केली, त्याचे कारण
स्थानिक पातळीवर कोणालाही माहिती नाही; परंतु ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कामगार
आणि अधिकारी वर्गात अस्वस्थता आहे.  

कर्मचारी संभ्रमात; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने चर्चा

दृष्टिक्षेपात

  कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता ः १०५ टीएमसी

  वीज प्रकल्पाची उभारणी तीन टप्प्यांत

  चौथ्या टप्प्यासाठी १ हजार ४६७ कोटी खर्च

  चौथ्या टप्प्यात २५० मेगावॉट क्षमतेचे चार संच 

  चौथ्या टप्प्यातील वीज निर्मिती प्रकल्प भूमिगत, आशिया खंडातील एकमेव

  २००६ मध्ये राज्य वीज महामंडळाच्या झाल्या तीन कंपन्या

कोयना वीज निर्मिती संकुलनाच्या खासगीकरणाला आमचा विरोध आहे. यापूर्वीही
आम्ही आंदोलन करून विरोध दर्शवला आहे. यापुढेही करू. विद्युतक्षेत्राचे
खासगीकरण झाल्यास भांडवलशाहीला वाव मिळेल. सामान्य ग्राहक आणि कामगार या
सर्वांनाच त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे हा लढा केवळ कामगारांचा आहे,
असे न समजता ग्राहकांनी आमच्याबरोबर येऊन विद्युत सुधारणा विधेयकाला विरोध
करावा.


Tags: राज्य
Previous Post

थंडी वा-यासह साता-यात पाऊस; चहाच्या टप-यांवर गर्दी

Next Post

‘कराड जनता’ च्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज; पोलिसांत धाव

Next Post

'कराड जनता' च्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज; पोलिसांत धाव

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!