स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने चर्चा: कोयनेच्या चौथ्या टप्प्याचे खासगीकरण

Team Sthairya by Team Sthairya
December 14, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, दि.१४ : केंद्र सरकारच्या प्रस्तावित
विद्युत सुधारणा विधेयक २०२० नुसार ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार
आहे. महाराष्ट्रात या विधेयकाची अंमलबजावणी करताना कोयना प्रकल्पाच्या
चौथ्या टप्प्याचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी चौथ्या टप्प्याची पाहणी केल्यानंतर या चर्चेला आणखी बळ
मिळाले आहे. 

राज्यातील दिवसभराच्या वीज वापराचा आलेख पाहिल्यानंतर सकाळी व संध्याकाळी
विजेची गरज जास्त भासते. म्हणून विजेच्या अधिक मागणीच्या काळात जास्त वीज
उत्पादन करण्याच्या दृष्टीने कोयना प्रकल्पाच्या ‘टप्पा ४’ची उभारणी
करण्यात आली. त्यासाठी १ हजार ४६७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या
टप्प्यामध्ये २५० मेगावॉट क्षमतेचे चार संच बसवले आहेत.

मागणीच्या काळात एक हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. १९८५ मध्ये सुरू
झालेला हा प्रकल्प २००० मध्ये कार्यान्वित झाला. २००६ मध्ये राज्य वीज
महामंडळाचे चार कंपन्यांमध्ये रूपांतर झाले. तेव्हापासून कोयनेच्या चौथ्या
टप्प्याचे खासगीकरण होणार, अशी चर्चा सुरू आहे. आता केंद्र सरकारने विद्युत
सुधारणा विधेयक २०२० आणले आहे. त्यामुळे पुन्हा या टप्प्याच्या
खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. १० डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी कोयना प्रकल्पाची पाहणी करून वीज निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली.
मुख्यमंत्र्यांनी चौथ्या टप्प्याची पाहणी नेमकी कशासाठी केली, त्याचे कारण
स्थानिक पातळीवर कोणालाही माहिती नाही; परंतु ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कामगार
आणि अधिकारी वर्गात अस्वस्थता आहे.  

कर्मचारी संभ्रमात; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने चर्चा

दृष्टिक्षेपात

  कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता ः १०५ टीएमसी

  वीज प्रकल्पाची उभारणी तीन टप्प्यांत

  चौथ्या टप्प्यासाठी १ हजार ४६७ कोटी खर्च

  चौथ्या टप्प्यात २५० मेगावॉट क्षमतेचे चार संच 

  चौथ्या टप्प्यातील वीज निर्मिती प्रकल्प भूमिगत, आशिया खंडातील एकमेव

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

  २००६ मध्ये राज्य वीज महामंडळाच्या झाल्या तीन कंपन्या

कोयना वीज निर्मिती संकुलनाच्या खासगीकरणाला आमचा विरोध आहे. यापूर्वीही
आम्ही आंदोलन करून विरोध दर्शवला आहे. यापुढेही करू. विद्युतक्षेत्राचे
खासगीकरण झाल्यास भांडवलशाहीला वाव मिळेल. सामान्य ग्राहक आणि कामगार या
सर्वांनाच त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे हा लढा केवळ कामगारांचा आहे,
असे न समजता ग्राहकांनी आमच्याबरोबर येऊन विद्युत सुधारणा विधेयकाला विरोध
करावा.

Related


Tags: राज्य
Previous Post

थंडी वा-यासह साता-यात पाऊस; चहाच्या टप-यांवर गर्दी

Next Post

‘कराड जनता’ च्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज; पोलिसांत धाव

Next Post

'कराड जनता' च्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज; पोलिसांत धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार

August 12, 2022

माजी समाजकल्याण मंत्री मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रद्रेश कॉंग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न..!

August 12, 2022

स्वराज्य सप्ताह अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम

August 12, 2022

कारागृहातील बंदिवानांनी भविष्याला सकारात्मक दिशा द्यावी – माहिती संचालक हेमराज बागुल

August 12, 2022

आदिवासी बांधवांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला

August 12, 2022

एकमेकींना राखी बांधून वाईट प्रवृत्तींपासून रक्षा करण्याचं दिलं वचन

August 12, 2022

फलटण येथे काँग्रेसची आझादी गौरव यात्रा संपन्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

August 12, 2022

घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वाटप; किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती कापसे यांचा उपक्रम

August 12, 2022

Phaltan : त्वरीत पाहिजेत

August 12, 2022

राज्यभरात ‘अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा’ मोहिमेचे आयोजन

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!