स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘आम्ही कोणाचाही बचाव केलेला नाही, पुराव्यांशिवाय कुणावरही कारवाई केली जाणार नाही’

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 16, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि. १६: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होते आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्येही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आजही महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठकी सुरू आहे. दरम्यान आम्ही कुणाचाही बचाव केलेला नाही, पुराव्यांशिवाय कुणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीमधून बाहेर पडताना उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, या प्रकरणात जो दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही चांगल्या प्रकारे एकत्र काम करत आहोत.’

सचिन वाझेंच्या प्रश्नावर काय म्हणाले अजित पवार?
सचिन वाझे यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले की, ‘या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई केली आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून इतर अधिकाऱ्यांविषयी ब्रेकिंग न्यूज येत आहेत. याला हटवण्यात येईल, त्याला हटवण्यात येईल. मात्र सरकार कोणताही निर्णय असाच घेत नाही. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे की, पुराव्यांच्या आधारेच आम्ही एखाद्याला हटवू किंवा त्याच्यावर कारवाई करु. अफवांच्या आधारे कोणावरही कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’

मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही – मलिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब आणि जयंत पाटीलही उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अँटिलिया प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सचिन वाझेंविषयी प्रमुख मंत्र्यांसोबत चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पूर्णविराम देत मंत्रिमंडळात फेरबदल होणार नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच अधिकाऱ्यांच्या बदल्याही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना महामारीत आशा स्वयंसेविकांचे कार्य अनमोल – सौ. वेदांतिकाराजे, कोरोना योद्धा म्हणून केला गौरव

Next Post

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे सोपे नाही, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा विरोधकांना टोला

Next Post

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे सोपे नाही, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा विरोधकांना टोला

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 21, 2021

नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

April 21, 2021

दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

April 21, 2021

फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

April 21, 2021

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर

April 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा

April 21, 2021

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार

April 21, 2021

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 21, 2021

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 21, 2021

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

April 21, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.