स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्ष निवडीला संख्याबळ टिकवण्याची सत्ताधारी, विरोधकांना चिंता

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 12, 2021
in मुंबई - पुणे - ठाणे
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि. १२: नाना पटोले यांच्या राजीनाम्याने रिक्त असलेले विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी संख्याबळ टिकवताना सत्ताधारी आणि विरोधक दोघांना जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीत चिंता असून बिनविरोध निवडीचे भाजपने संकेत दिले आहेत.

१ मार्चपासून विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत भरत आहे. अधिवेशनात नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान होते. त्यामुळे मते फुटण्याची दोन्ही बाजूला भीती आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी मिळालेल्या मतांमध्ये घट झाल्यास सत्ताधारी किंवा विरोधकांपैकी एका गटावर नामुष्की ओढावणार आहे. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सरकारने उघड मतदानाद्वारे विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यावेळी सरकारच्या बाजूने १६९, विरोधकांनी बहिष्कार केला तर ४ मते तटस्थ होती. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ असे सत्ताधारी गटाकडे १५४ संख्याबळ आहे. बहुमतासाठी १४५ संख्याबळ हवे असते. मात्र, छोट्या व अपक्षांची १५ मते मिळाल्याने १६९ आकडा महाविकास आघाडी सरकारने गाठला होता. तर भाजपकडे स्वत:ची १०४ मते होती. बहुमताची परीक्षा उघड मताने झाली होती. विधानसभा अध्यक्षपद निवड गुप्त मतदान पद्धतीने होते. माकप, एमआयएम, मनसे हे मागच्या वेळी तटस्थ होते. या वेळी राज्यातील बदललेल्या राजकीय परस्थितीत छोटे पक्ष आपली भूमिका बदलू शकतात. छोट्या पक्षांचे व अपक्षांचे २९ इतके संख्याबळ आहे. तसेच काही भाजपचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी अध्यक्ष निवडीवेळी १७५ चा आकडा पार करेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा दावा आहे.

बिनविरोध निवडीचे संकेत

अध्यक्ष निवड बिनविरोध करण्याची परंपरा आहे. पण, सत्ताधारी यांच्यावर त्याची अधिक जबाबदारी असते, असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध निवडीचे संकेत दिले आहेत. कारण, गुप्त मतदान पद्धतीचा लाभ सत्ताधारी गटाला अधिक होत असतो. त्यामुळे विरोधकांना आहे ते संख्याबळ घटण्याची भीती अधिक असते. तशी ती राज्यातील भाजपलासुद्धा आहे. पटोले यांची निवड बिनविरोध झाली होती. या वेळीसुद्धा बिनविरोध होईल. कारण दोन्ही गटाला संख्याबळ टिकवणे व त्यासाठी अनाठायी उठाठेव करण्याची इच्छा नाही.

निवड प्रक्रिया कशी होणार हे गुलदस्त्यात

फ्लोअर टेस्टची जबाबदारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर असणार आहे. अधिवेशनाच्या प्रारंभी की शेवटी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप ठरलेले नाही. ते ठरल्यावर सर्वानुमते व्यक्तीची निवड केली जाईल. हे सर्व अधिवेशनाच्या एक ते दोन दिवस अगोदर होईल, असे सांगितले जाते.


ADVERTISEMENT
Previous Post

आता आदित्य ठाकरेंच्या नावानेही सरकारी योजना; मागासवर्गीय युवकांना दिले जाणार वाहन प्रशिक्षण

Next Post

पैसे कमवा, परंतु भारतीय कायदे मानावेच लागतील; माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा फेसबुक, ट्विटरला इशारा

Next Post

पैसे कमवा, परंतु भारतीय कायदे मानावेच लागतील; माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा फेसबुक, ट्विटरला इशारा

ताज्या बातम्या

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी

March 5, 2021

शिक्षणमंत्र्यांचा खुलासा : 31 हजार शिक्षकांचे अस्तित्व पणाला, ना वेतन ना दिलासा; संधी देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

March 5, 2021

अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल

March 5, 2021

हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

March 5, 2021

ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी

March 5, 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

March 5, 2021

नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश

March 5, 2021

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

March 5, 2021

अनंत अडचणीत पारदर्शी व काटकसरीने सद्गुरू पतसंस्था कार्यरत

March 5, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त सुझुकी वाहन खरेदीवर ऑफर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.