• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

राज्यात भाजपच्या अडचणी वाढणार? ‘जलयुक्त शिवार’च्या खुल्या चौकशीसाठी समिती गठीत

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 1, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य,मुंबई, दि 1: जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर आता याप्रकरणी समिती गठीत करण्यात आली आहे.

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना ओळखली जाते. मात्र याच योजनेची आता खुली चौकशी होणार असल्याने भाजपच्या अडचणी वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.जलयुक्त शिवार योजनेच्या कोणत्या कामांची खुली चौकशी व्हावी, हे ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. कामं खूप असल्याने नेमक्या कोणत्या कामांची चौकशी करायची, याबाबत ही समिती आपलं मत देणार आहे. 

समितीत कोणाचा समावेश? 

1. विजय कुमार, सेवानिवृत्त अप्पर सचिव

2. अतिरिक्त पोलीस महासंचालक, एसीबी

3. संजय बेलसरे, मुख्य अभियंता जलसंपदा

4. कार्यरत संचालक, मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन

समिती नेमकं काय काम करणार? 

या समितीने 13 जिल्ह्यातील 120 गावातील 1128 कामांपैकी कोणत्या कामांची चौकशी खुल्या पद्धतीने व्हावी हे ठरवायचं आहे. जर ती फक्त प्रशासकीय / विभागीय चौकशी असेल तर तर संबंधित विभागाला कळवावी. 2015 पासून प्राप्त 600 अधिक तक्रारींची छाननी करावी. या समितीला 6 महिन्याचा अवधी असणार आहे. दर महिन्याला समितीने कोणत्या शिफारशी केल्यात त्यांचा अहवाल सरकारला दावा लागणार आहे.

नेमका काय आहे ठाकरे सरकारचा निर्णय? 

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने ऑक्टोबरमध्ये निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती. कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले होते, त्या अनुषंगाने चौकशी होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी 9 हजार कोटी खर्च झाला, मात्र त्याचा फायदा झाला नाही, असा आरोप आहे. योजना राबवूनही राज्यात टँकरची संख्या वाढली, मात्र भूजल पातळी वाढली नाही.

भाजपने कसं दिलं होतं उत्तर? 

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यानंतर भाजपने जोरदार पलटवार केला होता. ‘संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत केलेले श्रम अपार आहेत. तुम्ही या श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला होता.


Tags: राज्य
Previous Post

इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध एकाधिकारशाहीसाठी : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची टीका

Next Post

शिक्रापूर : छुप्या पद्धतीने टेम्पोतून चंदन वाहतूक करणारा जेरबंद

Next Post

शिक्रापूर : छुप्या पद्धतीने टेम्पोतून चंदन वाहतूक करणारा जेरबंद

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!