स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कऱ्हाडात भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन; केला ठाकरे सरकारचा निषेध

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, कऱ्हाड, दि. 23 : कोरोना महामारीच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत कऱ्हाडात भाजपने ठाकरे सरकारचा निषेध केला. मेरा आंगण मेरा रणांगण या भाजपने दिलेल्या नाऱ्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २२ मे रोजी मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याला अनुसरून शहरातील कार्यकर्त्यांनी आपापल्या घरासमोर हे आंदोलन सामाजिक अंतराचे भान ठेवून केले. यावेळी काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रेबीन, काळे मास्क, काळे शर्ट याचा आवर्जून उपयोग केल्याचे पाहायला मिळाले.

भाजपचे प्रवक्ते, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी कुटुंबीयांसमवेत कऱ्हाड येथील राहत्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

पंढरपूर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर येथे निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांच्या हातात सरकारच्या निषेधाचे फलक होते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सोमवार पेठेत घरासमोर हे आंदोलन केले.

महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव ठाकरे मात्र स्वत:च्या घरात, उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार अशा आशयाच्या निषेधाचे फलक भाजप कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते. तर काळे कपडे, काळे मास्क, काळे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना नियंत्रणात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. गरीब, गरजू, लोकांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना यांना पिणाऱ्यांचा प्रश्न पडला असून, घरपोच दारू देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. म्हणूनच गांभीर्याची जाण नसणाऱ्या या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.
– शेखर चरेगावकर


Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

सावधानता बाळगून निर्मितीविषयक कामेही सुरु करण्याचा विचार

Next Post

राज्यात 5 हजार 975 अनुज्ञप्ती सुरू

Next Post

राज्यात 5 हजार 975 अनुज्ञप्ती सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.