वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून 133 नागरिकांचे सातारा जिल्ह्यात आगमन : विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर


स्थैर्य, सातारा (प्रसन्न रूद्रभटे) : सातारा जिल्ह्यामध्ये  23 जून 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये  परदेशातून एकूण 133 नागरिकांचे आगामन झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली.

या वेळी बोलताना डॉ. म्हैसेकर म्हणाले की, 457 व्यक्तींचे दुसऱ्या टप्प्यामध्ये 789 त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यात 1 हजार 195 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण  परदेशातून  2 हजार 441  व्यक्तींचे आगमन झालेले आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील 1 हजार 986, सातारा जिल्हयातील 133, सांगली जिल्हयातील 119, सोलापूर जिल्हयातील 99 तर कोल्हापूर जिल्हयातील 104 व्यक्तींचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!