स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पुणे – नाशिक महामार्गावर आणखी एका बिबट्याचा मृत्यू

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 22, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.२२:  रस्ता ओलांडण्याच्या नादात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत नर जातीच्या बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे येथील उड्डाणपुलावर घडली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीने बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या महामार्गावर आणखी किती जंगली प्राण्यांचा बळी जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथे उड्डाणपूल असून, रविवारी पहाटे बिबटय़ा महामार्ग ओलांडण्याच्या नादात असताना त्याला भरधाव वाहनाची जोरदार धडक बसल्याने तो जागीच ठार झाला आहे. आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी या बिबटय़ाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर काही जणांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक सी. डी. कासार, अरुण यादव यांनी घटनास्थळी धाव घेत त्या मृत बिबटय़ाला वाहनातून चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.

दरम्यान, यापूर्वीही डोळासणे शिवारात अशाच पद्धतीने महामार्ग ओलांडण्याच्या नादात बिबटय़ा ठार झाला होता. चंदनापुरी घाट, डोळासणे, एकलघाट आदी ठिकाणी महामार्गावर बिबटय़ांचे जीव गेले आहेत. त्यामुळे महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखीन किती बिबटय़ांना आपले जीव गमवावे लागणार आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

भक्ष्याच्या अथवा पाण्याच्या शोधात भटकंती करीत महामार्गावर येणाऱया वन्यजीवांचे बळी जाण्याच्या घटना सातत्याने तालुक्यातून समोर येऊ लागल्या आहेत. त्यातही संरक्षित असलेल्या बिबटय़ांची संख्या अधिक असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्यंतरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी संगमनेर तालुक्याच्या वनहद्दीचा दौरा केला होता. मात्र, तो दौरा हरित लवादाच्या अन्य एका आदेशापोटी माहितीची जमवाजमव करण्यासाठी होता. मात्र, त्यातही या महामार्गावर बिबटय़ांसाठी भुयारी मार्गाची घोषणा झाली होती. त्यानंतर पंधराच दिवसांत आणखी एका बिबटय़ाचा बळी गेला आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

तुम्ही माझे स्वप्न पूर्ण केले…! ‘बिग बॉस 14’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर भावूक झाली रूबीना दिलैक

Next Post

जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी; संपर्कात आलेल्या नागरिकांनी टेस्ट न केल्यास दाखल होणार गुन्हे : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Next Post

जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी; संपर्कात आलेल्या नागरिकांनी टेस्ट न केल्यास दाखल होणार गुन्हे : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्या

हिरेन मृत्यू : अँटिलिया प्रकरणात काहीतरी गडबड आहे हे केंद्र सरकारच्या निर्णयावरून कळते : उद्धव ठाकरे

March 9, 2021

आरोग्य खात्यातील नऊ हजार रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

March 9, 2021

‘या’ मैदानावर होणार भारत-न्यूझीलंड जागतिक कसोटी फायनल; सौरव गांगुलीने दिला दुजोरा

March 9, 2021

महाराष्ट्र अर्थसंकल्प : बजेट : महिलांसाठी सोहळा; आघाडीचा पालिकांवर डोळा, शेतकऱ्यांना दिलासा

March 9, 2021

रियाध : सौदीमध्ये तेल कंपनीवर हल्ला; क्रूड 3% महाग, दर वाढल्यास भारताला फटका

March 9, 2021

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.