• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

राज्यात 18 वयोगटापर्यंतच्या 2 कोटी मुलांची होणार आरोग्य तपासणी

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 22, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.२२: राज्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा राज्यातील 2 कोटी पेक्षा अधिक मुलांना लाभ होणार आहे. तपासणीत मुलांमध्ये आढळणाऱ्या समस्या तसेच जन्मत असलेले व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि अपंगत्वाचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत मुलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि विकास साधण्यासाठी हे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. राज्यभरातील कोरोना संसर्गामुळे या कार्यक्रमात खंड पडला आहे. मात्र लवकरच हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी आणि त्यांच्यात आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणा-या समस्या, जन्मत असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील जवळपास 2 कोटी मुलांना होणार आहे. अंगणवाडीस्तरावर 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून 2 वेळेस होणारी आरोग्य तपासणी हा या कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या व्यतिरिक्त शासकीय आणि निमशासकीय शाळेतील 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनाही या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. सदर आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य समस्यांवर मोफत उपचार पुरविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 2020-21 साठी एकूण 1195 पथके मंजुर करण्यात आलेली आहेत. यापैकी 1109 पथके महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी तर 55 पथके मुंबईसाठी मंजुर करण्यात आलेली आहेत. तसेच 31 पथके आदिवासी जिल्ह्यांमधील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत.


Tags: आरोग्य विषयकराज्य
Previous Post

राष्ट्रीय गणित दिवस; जाणून घ्या का साजरा केला जातो

Next Post

‘स्वाध्याय’ उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी

Next Post

'स्वाध्याय' उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!