स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘स्वाध्याय’ उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी

Team Sthairya by Team Sthairya
December 22, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.२२:महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) – स्टुडंट व्हॉट्सअॅप
बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली होती.
स्वाध्याय उपक्रम सुरू झाल्यापासून ६ आठवड्यांमध्ये ११ लाख विद्यार्थी सहभागी झाले
असून साप्ताहिक सराव आणि गृह शिक्षण यास सुरुवात केली आहे. स्वाध्याय उपक्रम हा व्हॉट्सअॅपवर
उपलब्ध असल्याने त्याची व्याप्ती आणि सहजता यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ
घेऊ शकतात.

दिनांक ३ नोव्हेंबर
२०२० रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय
(SWADHYAY) – स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रमाचे उदघाटन
मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या
हस्ते आणि मा. श्रीमती वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय विभाग, महाराष्ट्र राज्य;
मा. श्री विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत
झाले. या उपक्रमाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सअॅप
वापरुन सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या माध्यमातून पहिली ते
दहावी पर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या
घरी फोनवर उपलब्ध असतील आणि त्याचा उपयोग करून शिक्षक पालक आणि विद्यार्थी स्वतःस शैक्षणिक
सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळू शकेल. स्वाध्याय हा उपक्रम मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्याचे एक साधन म्हणून वापरले जात आहे. 

स्वाध्याय उपक्रमाबद्दल
उच्च प्राथमिक शाळा, पळसोडी, जिल्हा गोंदिया
येथील पूर्वा जांभूळकर
हिने आपले मत प्रदर्शित केले आहे. ती म्हणते – सुरुवातील
शाळा बंद झाल्याने आम्हाला प्रामुख्याने युट्युबमधील घटकांवर अवलंबून राहावे लागे.
परंतु आता स्वाध्याय उपलब्ध झाल्याने मी, माझी बहीण आणि माझ्या मैत्रिणी या एकाच फोनवरून
ठाराविक वेळेत स्वाध्याय सोडवितो, आलेल्या अडचणींबद्दल दीक्षा अॅपचे व्हिडिओ पाहतो
आणि शिक्षकांना विचारतो. स्वाध्यायामुळे अभ्यासात मजा येते आणि नवीन शिकण्यास मिळते.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

श्री
आनंद पळसे, गटशिक्षणाधिकारी, सातारा
यांनी आपला अनुभव
नमूद करताना सांगितले की, ‘कोरोना विषाणूंमुळे अचानक करण्यात आलेले लॉकडाउन आणि त्यामुळे
बंद झालेल्या शाळा यामुळे एक संकट निर्माण झाले होते. पण शासनाच्या शाळा बंद पण शिक्षण
आहे उपक्रमातंर्गत शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये ऑफलाईन
आणि ऑनलाईन अशा दोन्हींचा समावेश होता. त्यामुळे शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांचे
शिक्षण मात्र चालू राहिले. या लॉकडाउन च्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण जात होते
पण विद्यार्थी किती आणि कसे शिकत आहेत हे जाणून घेण्यास मर्यादा होत्या. स्वाध्यायामुळे
ती अडचण दूर होण्यास मदत झाली आणि विद्यार्थी किती शिकले आणि कुठे त्यांना सहकार्याची
आवश्यकता आहे हे आता शिक्षकांना कळेल.’

सामाजिक
कार्यकर्ते श्री. पिंटू चव्हाण, पेरले, तालुका कराड, जिल्हा सातारा,
यांनी स्वाध्यायबाबत प्रोत्साहन देणारा आपला अनुभव सांगितला, “आमच्या येथे बहुतेक लोक
अशिक्षित आहेत. ते स्मार्टफोन वापरु शकत नाहीत, ऑनलाइन क्लासमध्ये त्यांच्या मुलांना
सहभागी होण्यास अडचणी येतात. साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या महिन्यांत आम्ही आमच्या
समाजातील सुशिक्षित मुलांच्या मदतीने इतर मुलांचा अभ्यास सुरू ठेवण्यास मदत केली. तथापि,
इतकेच पुरेसे नव्हते. परंतु या स्वाध्यायमुळे विद्यार्थ्याना स्वतः विषय शिकण्याची
चिंता करण्याची गरज नाही. आता, समुदायामध्ये दररोज एक तास एक वर्ग होतो आणि जेथे विद्यार्थी
अडकतात, त्यांचे शिक्षक नेहमीच त्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध असतात.

सोबतच आता स्वाध्यायवर
एक नवीन फिचर जोडले जात आहे. आता स्वाध्यायमध्ये युडीआयएसई (UDISE) कोड जोडला जात असून
शिक्षक भविष्यात स्वतःच्या शाळेतील, वर्गातील विद्यार्थी यांची कामगिरी बघू शकतील आणि
विद्यार्थ्यांना मदत करू शकतील. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी
आणि गणिताचे विषय सुरू झाले असून इतर लवकरच उर्दू माध्यम, विज्ञान, विद्यार्थ्याचे
सामाजिक भावनिक जग याबाबतचाही घटक सुरू होणार असून विद्यार्थ्यांना स्वाध्यायाद्वारे
शैक्षणिक सहकार्यासोबतच इतर बाबतीतही सहकार्य केले जाणार आहे. स्वाध्यायामुळे आता प्रत्येक
घर आणि वस्ती शाळा झाली आहे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण ही समाजातील प्रत्येकाची सामाजिक
जबाबदारी आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. 

Related


Tags: राज्य
Previous Post

राज्यात 18 वयोगटापर्यंतच्या 2 कोटी मुलांची होणार आरोग्य तपासणी

Next Post

अफझल खान कबर परिसर पर्यटकांसाठी खुला करा; माजी आमदाराची प्रशासनाकडे मागणी

Next Post

अफझल खान कबर परिसर पर्यटकांसाठी खुला करा; माजी आमदाराची प्रशासनाकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वराज्य सप्ताह अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम

August 12, 2022

कारागृहातील बंदिवानांनी भविष्याला सकारात्मक दिशा द्यावी – माहिती संचालक हेमराज बागुल

August 12, 2022

आदिवासी बांधवांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला

August 12, 2022

एकमेकींना राखी बांधून वाईट प्रवृत्तींपासून रक्षा करण्याचं दिलं वचन

August 12, 2022

फलटण येथे काँग्रेसची आझादी गौरव यात्रा संपन्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

August 12, 2022

घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वाटप; किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती कापसे यांचा उपक्रम

August 12, 2022

Phaltan : त्वरीत पाहिजेत

August 12, 2022

राज्यभरात ‘अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा’ मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेले

August 12, 2022

परळी खोऱयात पावसाचा हाहाकार अतिवृष्टीमुळे नुकसान: उरमोडीचा विसर्ग वाढवला

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!