वीर धरणातून नीरा नदीत ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात


स्थैर्य, फलटण : भाटघर,  वीर, नीरा-देवघर, गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात  झाली असून वीर धरणात पाणी साठा वाढू लागल्याने विद्युत गृहातून काल (मंगळवार) दुपारी ४ वाजले पासून नीरा नदीत ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती वीर धरण उप अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.

मंगळवार दि. ११ रोजी सकाळी घेतलेल्या मोज मापाप्रमाणे, भाटघर धरण ६९.३०% भरले असून आज सकाळी संपलेल्या २४ तासात तेथे २२ मि. मी.पाऊस झाला असून आजअखेर एकूण ४८८ मि. मी. पाऊस झाला आहे. नीरा-देवघर ५६.३१% भरले असून तेथे ३२ मि. मी. पाऊस झाला आहे, आज अखेर एकूण १०४२ मि. मी. पाऊस झाला आहे. वीर धरण ९४.२६% भरले आहे. तेथे १७ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आज अखेर एकूण ३६० मि. मी. पाऊस झाला आहे. या धरणातून नीरा नदीत ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.नीरा उजवा व डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले नसल्याचे नलवडे यांनी नमूद केले आहे. गुंजवणी धरण ८६.११% भरले असून पाणलोट क्षेत्रात २४ मि. मी. एकूण ११५६ मि. मी. पाऊस झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!