स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनावश्यक ई-पास

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
अनावश्यक ई-पास
ADVERTISEMENT


स्थैर्य. फलटण : चिन मधील वूहान प्रांतात उगम पावलेल्या ‘कोरोना’ विषाणूचा उद्रेक 9 मार्च 2020 रोजी आपल्या महाराष्ट्रात सुरु झाला. आजमितीस संपूर्ण भारत देशात महाराष्ट्र हे कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. अर्थातच कोणतेही औषध उपबल्ध नसलेल्या व वेगाने फैलावणार्‍या या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी मार्च महिन्यापासून राज्यशासनाकडून जनतेवर अनेक निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे याचा दूरगामी परिणाम जनजीवनावर झाला आहे. 

29 जानेवारी 2020 रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला. महाराष्ट्रातील पहिला बळी 16 मार्च 2020 रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. याच दरम्यान जगभरातील विविध देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणावर विस्तारत होता. इटली, अमेरिका या देशांमधील भयावह परिस्थिती माध्यमांकडून वारंवार दाखवली जात होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अथवा नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लोकांच्या प्रवासावर मोठे निर्बंध घालण्यात आले. 11 मार्च 2020पासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व बससेवा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्या. 22 मार्च पासून प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करून एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. 

एकीकडे या सर्व निर्बंधांची सक्ती सुरु असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचा फैलाव सुरुच होता. मात्र तो केवळ मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये होता; राज्यातील विविध जिल्ह्यातील बहुतांश निमशहरी व ग्रामीण भाग कोरोनापासून सुरक्षित होता. दरम्यानच्या या लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून  विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना घरी जाता यावे यासाठी ‘ई-पास’; अर्थात प्रवासाचा परवाना काढून प्रवास करण्याची मूभा नागरिकांना देण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी जाण्याची सोय झाली; मात्र त्याचा दुसरा दुष्परिणाम असा झाला की, ग्रामीण भागातून कामानिमित्त कायमस्वरुपी मोठ-मोठ्या शहरात वास्तव्यास गेलेली अनेक कुटूंबे या ई – पास द्वारे आपापल्या घरी माघारी परतू लागली आणि यातील अनेक जणांनी आपल्या सोबत ‘कोरोना’ विषाणूलाही आणले. त्यातून सुरुवातीच्या काळात सुरक्षित राहिलेली अनेक निमशहरे, ग्रामीण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट व्हायला सुरुवात झाली. मुंबई, पुणे सारख्या बाधीत भागातून प्रवास करुन आलेले अनेकजण गावी आल्यानंतर कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच ‘ई-पास’ कोरोनाला एकप्रकारे निमंत्रणच ठरला. असो, हा झाला भूतकाळ.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

आता वर्तमानस्थितीचा विचार केला तर संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने नुकतेच राज्याला एका पत्राद्वारे ई-पास ची यंत्रणा बंद करण्याचे सूचित केले आहे. मात्र राज्यसरकार अजूनही ई-पास सक्तीवरच ठाम आहे. एकीकडे राज्यात ‘पुनश्‍च हरिओम’ ची घोषणा देवून लॉकडॉऊनमुळे बंद झालेले व्यवसाय, उद्योग धंदे सुरु करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे प्रवासासाठी निर्बंध कायम ठेवले जात आहेत. हे अतिशय विसंगत आहे. यामुळे अनेकांच्या कामकाजावर बंधने येत आहेत. शिवाय, यातील सर्वात मोठी गंमतीची बाब म्हणजे; नुकत्याच झालेल्या राज्यशासनाच्या निर्णयानुसार शासनाने अंतरजिल्हा एस.टी. बस सेवा सुरु केली आहे आणि या सेवेद्वारे प्रवास करताना ई-पासची अट ठेवलेली नाही. म्हणजे तुम्ही विना ई-पास एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात एस.टी. बस द्वारे प्रवास करु शकता. पण जर तुम्हाला तुमच्या खाजगी वाहनाने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ई – पास अजूनही सक्तीचा आहे. म्हणजे, ‘जर एस.टी.ने प्रवास केला तर कोरोनाचा फैलाव होणार नाही’ अशी जर कुणी सरकारच्या या निर्णयाची टिंगल केली तर त्यात गैर काहीच नाही. 

एकूणच या ई-पास चा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्ही तपासले तर याला अनावश्यक यासाठी म्हणता येईल, जेव्हा आवश्यकता नव्हती त्यावेळी ही यंत्रणा सुरु करण्यात आली आणि आता ही यंत्रणा थांबवण्याची गरज असताना ती अजूनही हट्टाने राबवली जात आहे. 

शेवटचा मुद्दा –

आजही ई-पास जरी सक्तीचा असला तरी अनेक जिल्ह्यांच्या सिमांवर वाहनांना विना तपासणी प्रवेश सहजतेने करता येत आहे. तर काही ठिकाणी थोडीशी वाट वाकडी करुन छोट्या – छोट्या गावांतून प्रवास करुन जिल्हा बंदीच्या निर्बंधातून लोक सटकत आहेत. त्यामुळे राज्यशासनाने ई-पास चा अनाठायी हट्ट थांबवावा, असेच सर्वसामान्यांचे मत आहे.

– रोहित वाकडे, 

संपादक, सा. लोकजागर, 

फलटण.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: पुणेफलटणराज्यसातारा
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील 496 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरम साधेपणाने साजरा करा

Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरम साधेपणाने साजरा करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरम साधेपणाने साजरा करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार- आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता

राज्यपाल नियुक्त आमदार यादी रोखणे 50 वर्षांत एकमेव घटना, टोकाची भूमिका संसदीय लोकशाहीला घातक : पवार

January 24, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

66 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

January 24, 2021
​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

January 24, 2021
भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

January 24, 2021
लग्न स्थळावर पोहोचण्यापूर्वी वरुणचा अपघात, थोडक्यात बचावला

लग्न स्थळावर पोहोचण्यापूर्वी वरुणचा अपघात, थोडक्यात बचावला

January 24, 2021
आम्हीही या देशाचे आहोत, आमचीही गणना करा; गोपीनाथ मुंडेंचा व्हिडिओ केला पोस्ट मुंबई40 मिनिटांपूर्वी

आम्हीही या देशाचे आहोत, आमचीही गणना करा; गोपीनाथ मुंडेंचा व्हिडिओ केला पोस्ट मुंबई40 मिनिटांपूर्वी

January 24, 2021
छत्रपती शिवेंद्रराजे उपमुख्यमंत्री ना. अजित पवारांच्या भेटीला; जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भेट ?

छत्रपती शिवेंद्रराजे उपमुख्यमंत्री ना. अजित पवारांच्या भेटीला; जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भेट ?

January 24, 2021

Kolki, Phaltan : सुभेदार मोबाईल ॲंण्ड ई-ग्राहक सेवा

January 24, 2021
कच्च्या लोखंडाच्या वाढत्या किमतीमुळे बंद होण्याच्या मार्गावर लहान प्लँट्स

कच्च्या लोखंडाच्या वाढत्या किमतीमुळे बंद होण्याच्या मार्गावर लहान प्लँट्स

January 24, 2021
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच ‘जेल पर्यटन’- गृहमंत्री अनिल देशमुख

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच ‘जेल पर्यटन’- गृहमंत्री अनिल देशमुख

January 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.