सातारा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जण बेपत्ता


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जण बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 ऑगस्ट रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संजय नथुराम देवरे वय 52, राहणार सावळी, पोस्ट दहिवड, तालुका सातारा हे एसटी स्टँड ला जाऊन गावी जातो, असे सांगून निघून गेले. परंतु ते अद्यापपर्यंत घरी पोहोचले नसल्याची फिर्याद जगन्नाथ सोमनाथ देवरे वय 50 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

दुसऱ्या घटनेत, दिनांक 28 ऑगस्ट रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास करिष्मा राजू शेख वय 24, राहणार खावली, तालुका सातारा ही युवती मैत्रिणीकडे जाते, असे सांगून राहत्या घरातून निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद रुक्साना राजू शेख वय 45 यांनी नोंदवली आहे.
तिसऱ्या घटनेत दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाळू नामदेव मंडलिक वय 46, राहणार प्रतापसिंह नगर, खेड, सातारा हे घरातून जॉगिंग करून येतो, असे सांगून निघून गेले आहेत. ते अद्याप पर्यंत आले नसल्याची फिर्याद त्यांचा मुलगा स्वप्नील बाळू मंडलिक वय 23 यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.


Back to top button
Don`t copy text!