• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

यंदाची श्रीराम रथोत्सव यात्रा रद्द; फेरीवाले व दुकानदारांना स्टॉल लावण्यास बंदी : मुख्याधिकारी प्रसाद काटकर

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 10, 2020
in Uncategorized

स्थैर्य, फलटण दि.10 : ‘कोरोना’चा प्रसार अद्याप सुरु असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी यंदाची श्रीराम रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आले असल्याचे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी ‘स्थैर्य’शी बोलताना सांगितले. दरवर्षी यात्रा काळात फेरीवाले व दुकानदारांकडून लावण्यात येणार्‍या स्टॉल्सला यंदा बंदी घालण्यात आली असून हा आदेश मोडून जर कोणी स्टॉल लावल्यास त्यावर पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही काटकर यांनी यावेळी सूचित केले.

संस्थान काळापासून सुरू असलेल्या येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेस प्रतीवर्षी राज्याच्या विविध भागातून हजारो श्रीराम भक्त येत असतात. नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे 250 वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा फलटण नगरीत अव्याहत सुरु आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. यंदा मंगळवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी रथाचा दिवस असून कोरोनाचे संकट लक्षात घेता साध्या पद्धतीने गर्दी टाळून उत्सव साजरा करावा लागणार आहे. भाविकांनी या दिवशी प्रशासनास सहकार्य करुन घरीच थांबून प्रभू श्रीरामांचे पूजन करुन ‘कोरोना’ मुक्तीचे साकडे घालावे व पुढल्या वर्षी पुन्हा दरवर्षीप्रमाणे उत्साहात रथोत्सव साजरा करावा, असेही आवाहन प्रसाद काटकर यांनी नागरिकांना केले आहे.

दरम्यान, रथोत्सवाच्या नियोजनासंबंधी प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत डॉ.शिवाजीराव जगताप यांनी श्रीराम देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी. सामाजिक अंतराचे पालन करावे. मंदीर परिसरात दिवसातून 2 वेळा निर्जंतुकीकरण करावे असे सांगून भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

या बैठकीस तहसिलदार समीर यादव, फलटण पोलीस निरीक्षक पी.डी.पोमण, फलटण नगरपरिषदेचे मुर्श्ताफ महात, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ यादव उपस्थित होते.


Tags: फलटण
Previous Post

राजु मारुडा यांचे आंबेडकर चळवळीत भिमसैनिक म्हणून निष्ठापूर्वक काम : अशोकराव गायकवाड

Next Post

फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावर ‘महाविकास आघाडी’ टिकणार कां?; आगामी निवडणूकांवरुन राजकीय वर्तृळातून तर्कवितर्कांना उधाण

Next Post

फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावर ‘महाविकास आघाडी’ टिकणार कां?; आगामी निवडणूकांवरुन राजकीय वर्तृळातून तर्कवितर्कांना उधाण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!