• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

“हे सरकार धनगरांचा तिरस्कार करणारं सरकार” : गोपीचंद पडळकर

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 14, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, मुंबई, दि.१४ : धनगर समाजाचा सरकारला विसर पडलाय असं म्हणत आज
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाबाहेर आंदोलन केलं. महत्त्वाचे
प्रश्न तेवत ठेवण्याचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं धोरणं असल्याचं गोपीचंद
पडळकर म्हणालेत. तसा आरोप त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केला आहे. आज
विधान भवनाबाहेर गोपीचंद पडळकर यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.
मागण्यांचा एक फलक गोपीचंद पडळकर यांनी हातात घेतला होता, या सोबतच ढोल
वाजवत पडळकर यांनी आंदोलन केलं. त्यानंतर पडळकर यांच्याकडील फलक
पोलिसांकडून काढून टाकण्यात आला. 

“हे सरकार झोपलेलं आहे . सरकारला जागं करण्यासाठी आज
इथे ढोल घेऊन आलो. ढोल हे आमचं पारंपरिक वाद्य आहे, त्यावर आमचे पारंपरिक
कार्यक्रम चालतात. म्हणूनच ढोल वाजवून झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं
करण्याचा प्रयन्त केला.

मी येताना १६ विविध मागण्यांचा फलक देखील आणला होता.
तो फलक पोलिसांनी मोडीत काढलेला आहे. काही कारण नसताना मला ढोल
वाजवण्यापासून देखील रोखलं गेलं. सरकारच्या सूचनेनुसार आमच्या लोककलेला
पोलिसांनी रोखलेलं आहे.

हे सरकार आल्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठीची
एकही बैठक झालेली नाही. जे आदिवासींना ते धनगरांना फडणवीसांनी दिलं होतं.
२०१९ मध्ये जुलैमध्ये आमच्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली होती. मात्र
त्यातला एकही रुपया आम्हाला मिळेला नाही.

विरोधक असताना हेच डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावरती
घोंगडी आणि हातात काठी घेऊन अनेकदा आंदोलनं करताना आपल्याला पाहायला
मिळाले होते. मात्र, जेंव्हा ते सत्तेत आलेत तेंव्हा ते धनगरांचा तिरस्कार
करतायत.

या सरकारने यशवंत महामेश योजना देखील बंद केली.
याअंतर्गत ४७ हजार रुपये भरून धनगर समाजातील १५ ते २० युवकांना ३
लाखांपर्यंतची मेंढरं मिळत होती. मात्र हे सरकार धनगरांच्या विरोधातील
सरकार आहे, भटक्या विमुक्तांच्या विरोधातील हे सरकार आहे. माझ्या मागण्या
मांडण्यासाठी मी बोर्ड बनवून आणला होता. मात्र पोलिसांकडून तो मोडण्यात
आला, मी सरकारचा निषेध करतो,” असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.     


Tags: राज्य
Previous Post

‘कराड जनता’ च्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज; पोलिसांत धाव

Next Post

जीमेल आणि यूट्यूबसह गूगलच्या सर्व सेवा 40 मिनीटानंतर पुर्ववत

Next Post

जीमेल आणि यूट्यूबसह गूगलच्या सर्व सेवा 40 मिनीटानंतर पुर्ववत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!