त्यांना धर्मावर अधारित असलेली हुकूमशाही देशात आणायची आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि.२६ : देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व काँग्रेसने दिलेली घटना यांना मान्य नाही, घटना निष्प्रभ करुन ते घटना व लोकशाही संपवायला लागले आहेत. त्यांना धर्मावर अधारित असलेली हुकूमशाही देशात आणायची आहे असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीत काँग्रेस पुरस्कृत शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व राष्ट्रवादी पुरस्कृत पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दिपकराव चव्हाण, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, ॲड. उदयसिंह पाटील, रणजित लाड, सचिन सूर्यवंशी-बेडके, रणजितसिंह देशमुख, डॉ. सुरेश जाधव, मनोहर शिंदे, महेंद्र सूर्यवंशी-बेडके, राजेंद्र शेलार आदींची यावेळी उपस्थिती होती.

अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन सातारा जिल्ह्याचा वैचारिक वारसा जपावा : श्रीमंत रामराजे

सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहे, त्यामुळे भविष्यात येवू घातलेला धोका वेळीच ओळखून या निवडणूकीसाठी मतदान करणे आवश्यक आहे असे स्पष्ट करुन चव्हाण म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोसळायला लागली आहे. असलेले कारखाने बंद पडत आहेत, नवीन सुरु होत नाहीत त्यामुळे रोजगार निर्माण होणार तरी कसा असा सवाल व्यक्त करुन गेल्या पंचेचाळीस वर्षात बेरोजगारीचा सर्वात जास्त दर या वर्षी पहावयास मिळाला आहे.देशाची अर्थव्यवस्था कोव्हिड पुर्वीच कोसळली आहे. मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटीसारखे हल्ले केल्याने कोव्हिड पुर्वीच अर्थव्यवस्था ३.१ टक्क्यापर्यंत खाली आली. युपीए सरकारच्या काळात विकास दर साडे नऊ टक्के होता. सदर निवडणूक भाजपाला रोखायची निवडणूक आहे. जीथे भाजपाच्या विचारांना आजवर यश आलं तीथे आपण त्यांना रोखलं तर ज्या कारणाने महाआघाडी सरकार अस्तित्वात आले ते कारण सफल झाले अस आपणास म्हणता येईल असे सांगून या निवडणूकीत महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

स्वागत महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी, प्रास्तविक सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी केले. प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं

कार्यक्रमास राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व घटक पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!