“श्रीराम” कारखान्याची पुढील सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२५ । मुंबई । फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये आज संपन्न झालेल्या सुनावणीमध्ये कोणतेही निर्देश नव्याने देण्यात आलेले नाहीत तर पुढील सुनावणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टी झाल्यानंतर संपन्न होणार आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वाद गेल्या काही दिवसांपासून रंगू लागला आहे. यामध्ये खासदार गटाच्या मागणी नुसार श्रीराम कारखान्यावर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर राजे गटाच्या वतीने त्यावर आव्हान देत सदरील नियुक्ती ही मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हटवण्यात असलेली होती.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेचा वाद हा मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने निवडणूक प्रक्रिया ठप्प आहे. येणाऱ्या काळात नक्की श्रीराम कारखान्याची निवडणूक कधी संपन्न होईल ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!