• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

राजा उदार झाला अन हाती भोपळा आला, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 15, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१५: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या
दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘महाविकास
आघाडी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. पूरग्रस्तांना
फक्त तीन हजार रुपयांचा धनादेश देणाऱ्या या सरकारची अवस्था राजा उदार झाला
अन् हाती भोपळा आला, अशी झाली आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभेत
बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘केंद्राच्या कृषी
कायद्याचे बारकाईने विवेचन करताना हा कायदा शेतकरी हिताचाच आहे. तत्कालीन
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांचाच या कृषी कायद्यात
समावेश करण्यात आला आहे’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस
पुढे म्हणाले की, ‘फक्त महाराष्ट्रातच खासगी एपीएमसी आहे. खासगी
एपीएमसीच्या माध्यमातूनच राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत आहे. तरीही
केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला जातोय. 2013 मध्ये तत्कालीन
पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी एक समिती
स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते. या समितीचा अहवाल
स्वीकारण्यात आला. त्यात कृषी मार्केटिंगमध्ये बदल करण्याची आणि
शेतकऱ्यांना पर्यायी स्पर्धात्मक बाजारपेठ हवी अशी सूचना करण्यात आली आहे
आणि आज तेच लोक केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत आहेत. हा कायद्याला
विरोध नसून, राजकीय विरोध आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरू’

मराठा
आरक्षणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आझाद मैदानात मराठा
समाजाचे आंदोलन सुरू आहे. आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयात दोन हिअरिंग
झाल्या. मात्र स्टे आला नाही. मात्र आता स्टे आला आहे. आमच्या काळात अनेक
आंदोलन झाली मात्र कोणाला अटक नाही झाली. आता तर अनेक मराठा तरुणांना घरीच
थांबवले जात आहे. त्यांना मुंबईत येऊ दिलं जात नाही. सरकार मधील मंत्री
सरकार विरोधात मोर्चा कसे काढू शकतात. त्यांनी शपथ घेतली आहे. त्या शपथेचा
भंग होत आहे. ओबीसींच्या आरक्षणात कोणाला वाटेकरी होता येणार नाही असा ठराव
मंत्रीमंडळ बैठकीत घ्या. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सत्तारूढ पक्ष
करत असेल तर ते योग्य नाही, असेही ते म्हणाले.


Tags: राज्य
Previous Post

‘मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात, आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही’- मुख्यमंत्री

Next Post

महाराष्ट्रात पाकिस्तानचे झेंडे लावायचे का?

Next Post

महाराष्ट्रात पाकिस्तानचे झेंडे लावायचे का?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!