स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात, आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही’- मुख्यमंत्री

Team Sthairya by Team Sthairya
December 15, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१५: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या
दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
तसेच, मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ‘मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात
असून, ही लढाई आम्ही जिंकणारच’, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
तसेच, ‘मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागून
देणार नाही’, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

उद्धव
ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची
फौज जशीच्या तशी आहे. भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेले नाही. ही लढाई लढत
असताना मध्येच कुणी टुमणे काढले इतर समाजाचे आरक्षण काढणार का, असे
प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण
देताना अन्य कुठल्याही समाजाचे आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, असे
उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

कुंडल्या बघणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे चिमटे

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

महाविकास
आघाडी सरकार पडणार, असे म्हणनाऱ्यांचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी चांगलाच
समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘आम्ही सर्व आरोपांना उत्तर दिली आहेत. पण
आता कुणाला मानगुटीवरच बसायचे असेल तर त्याला काय करणार ? गेली वर्षभर
आमच्या कुंडल्या बघितल्या गेल्या. तुमच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, असे
सांगितलं गेले. सरकार पाडण्याचे मुहूर्तही काढले गेले. पण कुंडल्या बघणारे
आज आमच्या वर्षपूर्तीचे पुस्तक वाचत आहेत’, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढला.

‘फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा’

यावेळी
मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार
यांच्यानाही टोमणे लगावले. फडणवीस दिल्लीत गेले पाहिजे. त्यांचा अभ्यास
चांगला आहे. ते देशाचा विचार करतात. मोठा विचार करतात. त्यांनी दिल्लीत
जावे, अशी मुनगंटीवार यांची इच्छा आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढताच
सभागृहात एकच हशा उडाला.

मेट्रो मुद्द्यावरुन टीकास्त्र

यावेळी
मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ‘आज
मेट्रोला विरोध केला जात आहे. मोक्याच्या जागेवर मेट्रो बांधली जात आहे
म्हणून टीका होतेय. मागणी नसताना कांजूरमार्गमध्ये कारशेड होत असल्याचीही
टीका केली जात आहे. कारशेडची मागणी नव्हती म्हणणाऱ्यांनी बुलेट ट्रेनची तरी
मागणी होती का ते सांगावे? बुलेट ट्रेनची मागणी कुणी केली होती? कुणीच
नाही. आपल्याला किती स्टेशन मिळणार आहेत? तर फक्त चारच आणि अहमदाबादला
महाराष्ट्रातून किती लोक जाणार आहेत? असे सवाल त्यांनी केला. तसेच,
कारशेडमध्ये मिठाचा खडाच नव्हे तर मिठागरही टाकू नका, असा टोलाही
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

Related


Tags: राज्य
Previous Post

विनापरवानगी माहिती पत्रकावर माझा फोटो छापला : दशरथ निगडे

Next Post

राजा उदार झाला अन हाती भोपळा आला, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

Next Post

राजा उदार झाला अन हाती भोपळा आला, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

August 13, 2022

केंद्र पुरस्कृत योजनांचे काम समाधानकारक – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

August 13, 2022

जन जागृतीसाठी फलटणमध्ये वृक्षदिंडी संपन्न

August 13, 2022

मायणीतील जमीन फसवणूक प्रकरणात आ. जयकुमार गोरे यांना जामीन मंजूर

August 13, 2022

प्रवचने – देहाचे भोग आणि आनंद

August 13, 2022

यवतेश्वर घाटात कार तिनशे फुट दरीत

August 13, 2022

मोळाचा ओढा परिसरातील पाच गाळे पालिकेकडून सील

August 13, 2022

श्रीमंत रघुनाथराजे मोफत ध्वज देणार

August 13, 2022

अतिवृष्टीमुळे वावदरे येथे घरांची पडझड

August 13, 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सावरकर व लोकमान्य स्मारकास भेट

August 13, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!