स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

ओबीसी जनमोर्चाचे आमदार दीपक चव्हाणांना निवेदन

Team Sthairya by Team Sthairya
November 27, 2020
in Uncategorized

आमदार दीपक चव्हाण यांना निवेदन देताना दशरथ फुले, डॉ. बाळासाहेब शेंडे, माणिकराव सोनवलकर, दादासाहेब चोरमले, अजय माळवे, मिलिंद नेवसे, सुभाष भांबुरे.

स्थैर्य, फलटण, दि.२७ : राज्यातील ओबीसीं समाजाच्या अनेक मागण्या व विविध प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. तसेच नव्यानेच मराठा समाजातील काही नेतेमंडळींनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. या मागणीला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी “ओबीसी आरक्षण बचाव संघर्षवारी आमदारांच्या दारी” या उपक्रमांतर्गत आमदार दीपकराव चव्हाण यांना ओबीसी जनमोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाचे अनेक मागण्या व प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गंडांतर येवू पाहत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र ओबीसी समाज एकवटू लागला आहे. आज संविधान दिनानिमित्ताने राज्यात आजपासून पुढील चार दिवसा पर्यंत राज्यातील सर्व तालुक्यातील स्थानिक आमदारांना ओबीसी समाजाच्या वतीने प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आज “ओबीसी आरक्षण बचाव संघर्षवारी, आमदारांच्या दारी” या उपक्रमाअंतर्गत फलटण शहर व तालुक्यातील ओबीसी जनमोर्चाद्वारे आमदार दीपकराव चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले, नगरसेवक अजय माळवे, फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीचे अध्यक्ष सुभाष भांबुरे यांच्या हस्ते देण्यात आले.

कंगनाच्या बंगल्याची बीएमसीकडून झालेली तोडफोड हायकोर्टाने ठरवली बेकायदा!

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

सन १९३१ च्या जणगणनेनुसार भारतातील ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के आहे. ओबीसींना लोकसंखेच्या प्रमाणात प्रशासन व राजकारणात प्रतिनिधित्व मिळावे व शैक्षणिक सवलती मिळाव्यात यासाठी राज्यघटनेत तरतूदी आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. यासह विविध मागण्या, प्रलंबित प्रश्नांचा सदर निवेदनामध्ये समावेश आहे.

Related


Tags: फलटण
Previous Post

साताऱ्याच्या दोन मुली भारतीय कबड्डी संघाच्या शिबिरासाठी

Next Post

कंगनाच्या बंगल्याची बीएमसीकडून झालेली तोडफोड हायकोर्टाने ठरवली बेकायदा!

Next Post

कंगनाच्या बंगल्याची बीएमसीकडून झालेली तोडफोड हायकोर्टाने ठरवली बेकायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“हर घर तिरंगा” या अभियानासाठी फलटणमध्ये श्रीमंत संजीवराजे मोफत ध्वज देणार

August 11, 2022

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

August 11, 2022

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 11, 2022

देश स्वतंत्र करण्यासाठी तरुणांनी रक्ताचे अर्ध्य दिले

August 11, 2022

रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय असावा- शास्त्रज्ञ डॉ. इंडी

August 11, 2022

शहीद हसेन – हुसेन यांच्या ताबुताला आटपाडीच्या नाथांनी दिला खांदा !

August 11, 2022

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम प्रभात फेरी द्वारे संपन्न

August 11, 2022

आज काँग्रेसची आझादी गौरव यात्रा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

August 11, 2022

मुधोजी महाविद्यालयात M.Com. व M.Sc चे वर्ग सुरू

August 11, 2022
कटफळ गावातून रॅली काढताना झेनिबियाचे विद्यार्थी

झैनबिया स्कूलच्या वतीने घर घर तिरंगा रॅली

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!