• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा डाव : प्रवीण दरेकर

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 19, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, पुणे, दि.१९: मुंबईचा ठेका फक्त
शिवसेनेलाच दिलेला नाही. आम्ही पण मराठी आहोत आणि भाजपमध्येही मोठ्या
प्रमाणात मराठी माणसे आहेत, असे सांगतानाच मुंबईत हिंदुत्वाचा भगवा झेंडा
कोणाच्या हाती द्यायचा हे आगामी महापालिका निवडणुकीत जनताच ठरवेल, अशा
शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी
शिवसेनेला आव्हान दिले. महाराष्ट्रात काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचा डाव
शिवसेना आणि राष्ट्रवादीने रचला आहे, असा दावाही दरेकर यांनी यावेळी केला.

भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
आहे. शिवसेनेला त्याचे पेटंट कुणी दिलेले नाही, असे नमूद करताना आयुष्यभर
हिंदुत्वाला विरोध करणाºया पक्षाशी केवळ सत्तेसाठी मैत्री करून तुम्ही
एकप्रकारे भगव्याशी प्रतारणाच केली आहे, अशी तोफही दरेकर यांनी शिवसेनेवर
डागली.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे
उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
पुण्याच्या दौºयावर आहेत. यानिमित्ताने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत
बोलताना ठाकरे सरकारच्या कारभारावर दरेकर यांनी जोरदार टिका केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत
भाजपच्या कार्यकारिणीत जे ८-१० प्रमुख मुद्दे मांडले त्यातील एकाही विषयावर
शिवसेनेला स्पष्टीकरण देता आले नाही. कारण शिवसेनेला विकासाच्या मुद्यावर
बोलायचे नाही केवळ भावनिक वातावरण तयार करायचे आहे. कधी राज्यपाल, तर कधी
केंद्र सरकारच्या विषयावरुन वाद घडवून आणायचा आहे, इतकेच त्यांना माहीत
आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन
पक्षांचे असले तरी यामध्ये फक्त शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचेच
अस्तित्व दिसत आहे. काँग्रसेला मात्र डावलले जात आहे. राष्ट्रवादी व
शिवसेनेकडून काँग्रेसची सातत्याने फरफट होत आहे. या ठाकरे सरकारमध्ये
कोणत्याही प्रकारचा संवाद व ताळमेळ दिसत नाही, असेही दरेकर म्हणाले.
पदवीधरांचे विविध प्रश्न व समस्या या सरकारच्या काळात आहेत. या सरकारने
शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. रोजगाराचा व स्वंयरोजगाराचे प्रश्नही
प्रलंबित आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व
पदवीधरांचा आवाज विधिमंडळात पोहचवण्यासाठी उमेदवार संग्राम देशमुख यांना
विजयी करण्याचे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.


Tags: पुणे
Previous Post

सर्वोच्च न्यायालयने म्हटले- कोणत्याही राज्यात सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक

Next Post

नव्या ऊर्जा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या मंजूरी

Next Post

नव्या ऊर्जा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या मंजूरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!