• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर राजू शेट्टींचा एल्गार; सोमवारी साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 19, 2020
in Uncategorized

स्थैर्य, सातारा, दि.१९ : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली दि. 23 ते 25 या कालावधीत सातारा ते कराड असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची समाप्ती दि. 25 रोजी कराड येथे होणार असून त्याबाबतचे निवेदन नुकतेच संघटनेच्या वतीने राजू शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, देवानंद पाटील, जनार्दन आवारे, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार केंद्र आणि राज्य सरकारला निवेदने देण्यात आली आहेत. निवेदने देवूनही शासन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी दि. 23 ते 25 या कालावधीत हा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात दि. 23 रोजी सकाळी नउ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली सातारा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन होणार आहे. 

महाबळेश्वर, पांचगणीतील गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत 

यावेळी मागण्यांचे निवेदन ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देण्यात येणार आहे. पायी मोर्चाचा पहिला मुक्काम काशीळ येथे असणार असून दि. 24 रोजी सकाळी मोर्चा पुन्हा कराडकडे मार्गस्थ होईल. दि. 24 रोजी खोडशी येथे मोर्चा रात्रीचा मुक्काम करणार असून यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. याठिकाणाहून सकाळी मोर्चा कराडकडे मार्गस्थ होईल. दि. 25 रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन दिल्यानंतर थोड्यावेळासाठी ना. पाटील यांच्या घरासमोर इशारा आंदोलन करण्यात येणार आहे. इशारा आंदोलन संपवून मोर्चा कराड येथील प्रितीसंगम येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होणार आहे. समाधीला अभिवादन, चिंतन सत्याग्रह करुन येथे मोर्चाची समाप्ती करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


Tags: सातारा
Previous Post

महाबळेश्वर, पांचगणीतील गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

Next Post

मृत अर्भकप्रकरण : कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा ‘प्रहार’; हेळवाकला अर्धनग्न आंदोलन

Next Post

मृत अर्भकप्रकरण : कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा 'प्रहार'; हेळवाकला अर्धनग्न आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!