राज्यात गुरुवारी दिवसभरात 15 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज, एकूण रुग्णसंख्या 14.93 लाख; रिकव्हरी रेट 80.13%

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि. ९: राज्यात गुरुवारी 13 हजार 397 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 358 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या 14 लाख 93 हजार 884 झाली आहे. दरम्यान गुरुवारी 15 हजार 575 लोक बरे होऊन घरी गेले. यासोबत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 12 लाख 12 हजार 016 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 80.13% एवढा आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 39 हजार 430 झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 986 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!