स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक : पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणाचा खून; हल्ला द्वारका परिसरात बनेवाल टोळीचा रात्री धुडगूस

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 10, 2021
in उर्वरित महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, नाशिक, दि.१०: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणातून टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा खून करण्यात आला. भांडण सोडवण्यास गेलेल्या युवकावर हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला. सोमवारी (दि. ८) रात्री ११.३० वाजता मातंगवाडा येथील महालक्ष्मी चाळ परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी बनेवाल टोळीच्या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टोळीप्रमुख विशाल बनेवाल याच्यासह तीन-चार संशयित फरार झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, द्वारका परिसरातील मातंगवाडा येथील महालक्ष्मी चाळ येथे राहणारा आकाश संतोष रंजवे आणि त्याचा मित्र करण हे दोघे रात्री घराच्या अंगणात बसले असता संशयित विशाल बनेवाल, सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बनेवाल, हरिष पवार, मनीष डुलगज, शिवम पवार आणि त्याच्या साथीदारांनी ‘तू हमारे भाई की खबर पुलिस को देता है’ असा वाद घालून चाॅपर, तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.

या हल्यात आकाश आकाश रंजवे गंभीर जखमी झाला. त्याला सोडवण्यास गेलेल्या करणवरही टोळक्याने हल्ला केला. यात तोही गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी दोघांस तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना आकाश मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांच्या मागावर पथक पाठवले. यातील सहा संशयित ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांचे खबरे असुरक्षित; गुन्हेगारांकडून लक्ष्य

पोलिसांचे कान, नाक, डोळे म्हटले जाणारे व झिरो नंबर पोलिस म्हणून काम करणारे खबऱ्यांना गुन्हेगारांनी टार्गेट केले आहे. काही दिवसांपासून पोलिसांना माहिती देतो या कारणातून प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या घटना पोलिस दलात नक्कीच विचार करणाऱ्या आहेत. खबऱ्यांच्या जीवावर पोलिसांनी अनेक क्लिष्ट गुन्हे उघड केले आहे. मात्र, अशा जीवघेण्या हल्ल्यांमुळे पोलिसांना माहितीच कोणी देणार नाही. याचीदेखील गंभीर दखल यंत्रणेने घेणे गरजेचे आहे.

नातेवाइकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

रजेवेच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात जमा होत संशयितांना तत्काळ अटक करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. सहायक आयुक्त दीपाली खन्ना, निरीक्षक सोनवणे यांनी या प्रकरणात जे कोणी संशयित असतील त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.

तडीपार गुन्हेगारांची दहशत सुरूच

शहर व परिसरात तडीपार गुन्हेगारांची दहशत सुरूच असून या प्रकरणात संशयित विशाल बनेवाल हा सराईत गुन्हेगार आहे. परिमंडळाच्या उपायुक्तांनी त्याला तडीपार केले आहे. तो शहरात वास्तव्य असल्याचे त्याने हा गंभीर गुन्हा केल्याने या तडीपार गुन्हेगारांनी एकप्रकारे पोलिस यंत्रणेला आव्हान दिले असल्याचे निदर्शनास येते.


ADVERTISEMENT
Previous Post

प्रीमियम पेट्रोल 102 रुपये लिटर : मुंबईमध्ये पेट्रोल 94.12 रुपये, तर दिल्लीत 87.60 रुपये लिटर, आजही वाढू शकतात भाव

Next Post

‘टोलनाका मुक्त’ भारताचे उद्दिष्ट ४ महिन्यांत होऊ शकते साध्य

Next Post

‘टोलनाका मुक्त’ भारताचे उद्दिष्ट ४ महिन्यांत होऊ शकते साध्य

ताज्या बातम्या

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा ना. अजित पवार; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

March 1, 2021

‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा

March 1, 2021

विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द मोहीम तीव्र करणार गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

March 1, 2021

नेक्सझू मोबिलिटीने इलेक्ट्रिक सायकल रॉम्पस+ लॉन्च केली

March 1, 2021

शेंद्रे येथे मंगळवारी मधुमक्षिका पालन शिबीर

March 1, 2021

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी

March 1, 2021

गलवान हिंसेनंतर चीनने मुंबईच्या पॉवर सप्लाय सिस्टीमवर केला होता सायबर हल्ला

March 1, 2021

सुहास लिपारे यांचे निधन

March 1, 2021

कच्चा माल आमचा… पक्का पण आम्हीच करु…!!

March 1, 2021

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी; जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात धान्य वाटप व वृद्धश्रमास आर्थिक मदत

March 1, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.