स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 21, 2021
in देश विदेश

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२१: रंगभूमी, साहित्य, चित्रपट, क्रीडा, सामाजिक व राजकीय घडामोडींचे केंद्र असलेली महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ ही देशाच्या सांस्कृतिक एकजुटीचा वारसा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा विद्यमान खासदार कुमार केतकर यांनी आज केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राचा ‘मुंबई’ वारसा’ या विषयावर श्री.केतकर बोलत होते.

मुंबईचे व्यक्तीमत्व प्रामुख्याने गिरणगाव आणि यातील रंगभूमीने नटलेले होते. महाराष्ट्राची निर्मिती मुंबईसह व्हावी यासाठी १० ते १५ वर्षे प्रखर चळवळ झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर यांच्या शाहिरीने नटलेली असल्याने त्यांचेही संस्कार मुंबईतील गिरणगावावर होते, असे श्री.केतकर म्हणाले. पुढे महाराष्ट्राची निर्मिती होऊन मुंबई ही राज्याची राजधानी झाली आणि मुंबईचे चित्र झपाट्याने बदलत गेले.

गिरणगाव, गिरगाव, शिवाजी पार्क, पार्ला असे निरनिराळे सांस्कृतिक बेट मुंबईत तयार झाली होती. मुंबई ही सर्व भाषा, सर्व संस्कृती अशी सर्व समावेशक आहे. मुंबईचा वारसा हा मूलभूत मुल्यांवर आधारीत असल्यामुळे तो कायम टिकणारा असल्याचेही श्री.केतकर यांनी सांगितले.

मुंबई व कामगार चळवळ

मराठी भाषेचा मोठा प्रभाव मुंबईच्या वातावरणावर होता. गिरण्यांच्या संबंधित व्यवसायात लोक कामाला आले व मुंबईचे झाले. मुंबईच्या कामगार चळवळीचा संस्कार संबंध महाराष्ट्रावर होता. कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस.एम.जोशी, दत्ता देशमुख, प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रभाव सबंध महाराष्ट्रभर असे. हा प्रभाव आणि मुंबईचे वैशिष्ट्ये महाराष्ट्रभर पसरविण्याचे कार्य आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’  दैनिकासह अन्य दैनिकांनी प्रभावीपणे केले.

मुंबईने जपली राष्ट्रीय एकात्मता

राष्ट्रीय एकात्मता जपण्यामध्ये महत्त्वाची साधने असणाऱ्या चित्रपट आणि क्रिकेट यांनी संबंध देशाला एकत्व प्राप्त करून दिले. भारतातील चित्रपटाचे केंद्र असलेल्या मुंबईतील हिंदी चित्रपट सृष्टीमुळे जनसामान्यांमध्ये भारलेले वातावरण असायचे. आजही मुंबईच्या चित्रपट सृष्टीचा भारतावर सांस्कृतिक प्रभाव कायम आहे. मुंबईने देशाला क्रिकेटचा वारसा देत सुनिल गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर, दीलीप वेंगसरकर आदी जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू दिले असल्याचे श्री.केतकर म्हणाले.

देशाच्या अर्थकारणाचे केंद्र मुंबई

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील दलाल स्ट्रीटचा आर्थिक प्रभाव हा उदारमतवादी आर्थिक धोरणाच्या आधी भांडवली अर्थव्यवस्थेवर पडत असे.  मुंबईतूनच कामगार आणि भांडवलदार अशा दोन्ही प्रवाहाचा प्रभाव देशभर होत असे. पुढे १९७० नंतर ठाणे, विक्रोळी, भांडूप, बेलापूर परिसरात कारखाने आले व या शहाराला आर्थिक गती मिळाली. मुंबई बदलत गेली. संगणकाचे वर्चस्व वाढू लागले. येथील तरूणवर्ग आयआयटीकडे वळला. १९९० नंतर देशातील तरूण मोठ्या प्रमाणात परदेशात गेले आणि यात मुंबई आयआयटीतील ७० ते ८० टक्के तरूण होते.

मुंबईने दिला सामाजिक एकत्वाचा वारसा

मुंबईच्या जीवनात सामाजिक एकत्व निर्माण करण्याची ताकद आहे. ही ताकद देशभर पसरत गेली आणि यामुळे देशाचे एकत्व सिद्ध होत गेले. कामगार चळवळीचा श्रीगणेशा मुंबईतूनच झाला. देशातील स्वातंत्र्य चळवळीचे सर्व महत्त्वाचे ठराव मुंबईतूनच झाले. इथेच कम्युनिस्ट चळवळ, समाजवादी चळवळ, शेतकरी कामगार चळवळी आदि चळवळी वाढल्या. मानवी हक्क, वेतन हक्क, कामारांच्या हक्कांचे केंद्रही मुंबईच आहे. हे सबंध मुंबईचे वैशिष्ट्य सर्वांना भारावून टाकणारे असल्याचे श्री.केतकर यांनी प्रतिपादित केले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

अत्याधुनिक सुविधा पुरविल्यास पोलीस दल अधिक कार्यक्षमतेने काम करेल – पालकमंत्री जयंत पाटील

Next Post

प्रा.सतेश्वर मोरे यांच्या साहित्याने तरुणांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे भान जागविले – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post

प्रा.सतेश्वर मोरे यांच्या साहित्याने तरुणांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे भान जागविले – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,027 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

April 17, 2021

अत्याचारी इंग्रजांना चाप लावणारे चाफेकर बंधू

April 17, 2021

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

April 17, 2021

रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

April 17, 2021

शासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी – दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

April 17, 2021

फलटण तालुक्यातील १६९ तर सातारा जिल्ह्यातील १५४३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३८ बाधितांचा मृत्यु

April 17, 2021

जिल्हाधिकारी महोदय, फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सहभागी करून घ्या; नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांची मागणी

April 17, 2021

सजाई गार्डन येथे उभारणार १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर; फलटणकरांच्या मदतीला धावून आले उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे

April 17, 2021

मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 17, 2021

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार

April 17, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.