व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१६: देशात कोरोना व्हॅक्सीनेशनची सुरुवात करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. कोरोना काळात कठीण काळ आठवताना त्यांचे डोळे पाणावले आणि कंठ दाटून आला. ते म्हणाले की, जे आपल्याला सोडून गेले, त्यांना त्यांच्या हक्काचा निरोपही मिळू शकला नाही. मन उदास होतो, मात्र निराशेच्या त्या वातावरणा कुणीतरी आशेचा संचार करत होते. आपल्याला वाचवण्यासाठी प्राण संकटात टाकत होते.

ते म्हणाले की, आपले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, आशा वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले. आपल्या कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस घरी केले नाहीत. शेकडो साथी असे आहेत जे कधीच घरी परतू शकले नाहीत.

ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला, पहिला टीका त्यांच्यासाठी
त्यांनी एक-एक जीवन वाचवण्यासाठी आपले जीवन धोक्यात टाकले. यासाठी कोरोनाची पहिली लस आरोग्य सेवासंबंधीत लोकांना देऊन समाज आपले ऋण फेडत आहे. ही कृतज्ञ राष्ट्राची त्यांच्यासाठी आदरांजली आहे.

जी आपली दुर्बलता मानली जात होती ती शक्ती बनली
मोदी म्हणाले की मानवी इतिहासामध्ये बरीच संकटे आली, युद्धे झाली पण कोरोना एक साथीचा रोग होता, जो विज्ञान किंवा समाजाने अनुभवला नव्हता. ज्या बातम्या येत होत्या त्या संपूर्ण जगत तसेच प्रत्येक भारतीयला विचलित करत होत्या. अशा परिस्थितीत जगातील मोठे तज्ज्ञ भारताबद्दल अनेक शंका व्यक्त करीत होते. भारतातील मोठ्या लोकसंख्येला कमकुवतपणाचे वर्णन केले जात होते, परंतु आम्ही त्यास आपले सामर्थ्य बनवले.

वेळेपूर्वी आपण अलर्ट झालो – मोदी
मोदी म्हणाले की, 30 जानेवारीला भारतामध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण सापडले. मात्र याच्या दोन आठवड्यांपूर्वीच भारताने हाय लेव्हल कमिटी बनवली होती. 17 जानेवारी 2020 ला आपण पहिली एडवायजरी जारी केली होती. भारत त्या पहिल्या देशांमध्ये होता ज्यांनी आपल्या एअरपोर्टवर आपल्या प्रवाशांची स्क्रीनिंग सुरू केली होती. कोरोनाच्या विरोधातील लढाईत भारताने ज्या सामूहिक शक्तीचे प्रमाण सांगितले आहे त्याला येणाऱ्या पीढ्या स्मरणात ठेवतील.

आपण देशाचा आत्मविश्वास टिकवून ठेवला – PM
मोदी म्हणाले की, आपण टाळ्या वाजवून आणि दिवे लावून देशाचा आत्मविश्वास टिकवून ठेवला. कोरोना रोखण्यासाठी सर्वात प्रभावी पध्दत हिच होती की, जो व्यक्ती जिथे आहे त्याने तिथेच राहावे. पण देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला बंद ठेवणे सोपे नव्हते. याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ही आपली चिंता होती. मात्र आपण व्यक्तीच्या आयुष्याला प्राथमिकता दिली.


Back to top button
Don`t copy text!