स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ममतादीदी गरजल्या; ‘स्वतःचं शीर धडावेगळं करून घेईन, पण भाजपपुढे झुकणार नाही’

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 25, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य , नवी दिल्ली, दि .२५:  पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यात आली होती. यामुळे नाराज झालेल्या ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता सोमवारी झालेल्या एका सभेत ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी भाजपसमोर झुकण्याऐवजी स्वत:चं शीर धडावेगळं करून घेईन.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं असतं तर मी सलाम केला असता. मात्र जर तुम्ही मला बंदुकीची नळी रोखून भीती घालण्याचा प्रयत्न करत असाल तर मला माहिती आहे कसं उत्तर द्यायचं. त्यावेळी प्रेक्षकांनी बंगालचा अपमान केला होता. त्यांनी पंतप्रधानांसमोर माझा अपमान केला. मी बंदुकीवर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपने नेताजींचा आणि बंगालचा अपमान केला असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या भाषणादरम्यान जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तेव्हा नाराज झालेल्या ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार देताना स्टेजवरूनच पंतप्रधान मोदींसह भाजपला सुनावलं होतं. हा कोणत्या पक्षाचा नव्हे तर सरकारचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात अशा प्रकारची घोषणा बाजी तुम्हाला शोभत नाही. एखाद्याला बोलावून त्याचा अपमान करून नये असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाषण थांबवलं होतं.

कोलकत्यामध्येच पदयात्रा काढत ममतांनी भाजपवर निशाणा साधला. आता निवडणुका जवळ आल्याने भाजपला नेताजी आठवत आहेत असा टोला त्यांनी लगावला. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले होते पण उभय नेत्यांनी परस्परांशी बोलणे टाळले.


ADVERTISEMENT
Previous Post

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत;महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या प्रयत्नाला यश

Next Post

“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

Next Post

"पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही" - शरद पवार

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.