• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कराड : चिंतन बैठकीस प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती; संघटन पातळीवर भाजपचे बदलाचे संकेत

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 20, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, कराड, दि.२०: पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारण मीमांसा नक्की काय आहे, त्याची भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी संवाद साधून त्याची मीमांसा शोधण्याचे काम पक्षातर्फे येथे शनिवारी दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वगळून सुरू असलेल्या बैठकीला पक्षीय पातळीवर मोठे महत्त्व आले आहे. त्यामुळे संघटन पातळीवर काही बदलाचे संकेतही मिळत आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पुणे पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख येथे त्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.

भाजपच्या बैठकीला त्यांनी ग्रामपंचायत, महापालिका, पालिकांच्या निवडणुकांचीही जोड दिली आहे. त्यासाठी व्यक्तिगत व ग्रुप पातळीवर सरचिटणीस आमदार चव्हाण संपर्क साधत आहेत. संघटनमंत्री देशपांडे यांनी बैठकांचे नियोजन केले. मध्यवर्ती ठिकाण म्हणून कऱ्हाडची निवड झाली असली, तरी पक्षीय पातळीवर होणाऱ्या चिंतन बैठकीला प्रदेशाध्यक्ष पाटील यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाते. पाचही जिल्ह्यांतील प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे समर्थक फारसे कोणी बैठकीकडे फिरकले नाहीत. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी प्रदेश सरचिटणीसांना अर्ज पाठवून त्यांचे लेखी म्हणणे दिले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून भाजपचे पदाधिकारी भेटले आहेत. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षांचे समर्थक नव्हते. मात्र, जे पदाधिकारी भेटले आहेत. त्यांनी सरचिटणीस आमदार चव्हाण यांना काही फिडबॅक दिला आहे. सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा नेते अतुल भोसले, प्रवक्‍ते भरत पाटील यांच्यासह काही पदाधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातून धनंजय महाडिक, माजी आमदार अंमल महाडिक, जिल्हाध्यक्ष सत्यजित घाटगे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सांगली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शिराळा तालुक्‍यातून पापा नाईक, सोलापूर जिल्ह्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील, सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख, त्यांचे काही पदाधिकारी अशा चारही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची येथे चर्चा झाली. जिल्ह्यातून नोंदणी झालेले मतदान आणि प्रत्यक्षात झालेले मतदान यातील फरक कोणत्या कारणाने आहे, याची विचारणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्यादृष्टीने यापुढची पक्षाची बांधणी असणार आहे, असे संदेशही नेते, कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.


Tags: कराड
Previous Post

काय सांगता! दुष्काळी तालुक्यात हाेणार ऊसाची विक्रमी लागवड

Next Post

मुंबईतील सातारकरांसाठी ‘शिवशाही’ची संख्या वाढविली : रेश्‍मा गाडेकर

Next Post

मुंबईतील सातारकरांसाठी 'शिवशाही'ची संख्या वाढविली : रेश्‍मा गाडेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जिंती येथे एकास नऊ जणांकडून मारहाण

मे 29, 2023

निंबळकजवळ बुलेट गाडीच्या अपघातात युवक ठार

मे 29, 2023

महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

मे 29, 2023

वाठार फाटा येथील अपघातात दोघे जखमी

मे 29, 2023

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; उपळवे येथील घटना

मे 29, 2023

पृथ्वी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक पोलीस असून अडचण नसून खोळंबा

मे 29, 2023

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल – डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

पालखीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

मे 29, 2023

नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळा हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण : खासदार रणजितसिंह

मे 29, 2023
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे विध्यार्थी

“पुरानी जीन्स ओर गिटार” १६ वर्षानंतर भेटले जुने मित्र

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!