पंधरा दिवसांत नेर कालव्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडणार; सेनेचा ‘पाटबंधारे’ला इशारा


 

स्थैर्य, पुसेगाव, दि.१२: कालव्याची तातडीने दुरुस्ती करून रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नुकतेच आंदोलन केले. या वेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अमिन आगा, तसेच मुगटराव कदम, सूरज शिर्के व खटाव परिसरातील शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

नेर तलावाचा कालवा चार महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने फुटला आहे. त्यामुळे या कालव्याद्वारे ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रातील रब्बी पिके सध्या पाण्याची गरज असतानाही पाण्यापासून वंचित आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी मागणी करूनही फुटलेला कालवा अद्यापही दुरुस्त झालेला नाही. दुरुस्तीसाठी किमान एक महिना तरी लागणार असल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करा, अशी मागणी शेतकरी वारंवार करत होते; पण अधिकारी या मागणीची दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांचे पाण्याअभावी नुकसान टाळण्यासाठी प्रताप जाधव यांनी याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!